
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे. तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे. रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेने रचला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.
महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले
का केली हत्या?
चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. हा वाद पंचाच्या उपस्थित मिटविण्याचे प्रयत्नी करण्यात आले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे.
आरोपी महिला ताब्यात
या प्रकरणी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे चाकूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Ans: लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे
Ans: कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेला राग.
Ans: अवघ्या 17 तासांत तपास करून आरोपी महिलेला अटक केली.