काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आदित्य मिलिंद कोळी (वय २४) असे आहे. त्याने शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास वरच्या खोलीमध्ये लोखंडी अँगलला गळ्याला दोरी लावत आयुष्याचा शेवट केला. घरातील मंडळी कामावर गेल्यानंतर त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिट्टीमध्ये ऑनलाईन गेमिंगला बळी पडल्याचं त्याने म्हटलं आहे. या नादात पैसे गमावल्याने हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.
आदित्यच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती. त्याचा चुलत भाऊ भालचंद्र संजय कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासातच त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात शेरी मळा परिसरातील शेतात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा (४० वर्षीय) असे आहे. भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन देण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती.
Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे.
Ans: ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आलेले नैराश्य.
Ans: मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, ज्यात कारण नमूद आहे.






