
crime (फोटो सौजन्य: social media)
गुंगीचे औषध, मद्य पाजून…
मिळालेल्या माहिती नुसार, या घटनेतील अनैसर्गिक कृत्य करणारे विध्यार्थी हे दहावीचे विध्यार्थी आहे. तर ५ते ७ वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची माहिती आहे. गुंगीचे औषध व मद्य पाजून अत्याचार केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे. तर व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हा गंभीर प्रकार घडल्याचा दावा करत पालकांनी कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांकडून टाळाटाळ
संताप पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरी पोलिसांकडून मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. आता या टाळाटाळ करण्यामागील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे.
पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ
शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुले आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंदी झाल्या असून यात १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत. मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात.
मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि विविध चंटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.
Ans: इगतपुरीतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात घटना घडली.
Ans: दहावीच्या विद्यार्थ्यांकडून लहान वर्गातील मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
Ans: संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.