
crime news
अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यात विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन अशा प्रकारच्या घटना घडत असताना धारनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग मात्र कोणतीही कारवाई न करता गप्प बसला. यापूर्वीही असेच काही प्रकार घडले आहेत. यात शिक्षण विभागाने कानावर हात ठेवल्याचे दिसून आले. यातून विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
तेजस्विनी प्रकाश पवार नवीन गटशिक्षणाधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वी नियुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नियुक्ती होऊनही त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचं समोर येत आहे. तालुक्यात शिक्षण विभाग वाऱ्यावर असून विद्यार्थिनीची सुरक्षितता धोक्यात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी पदभार तातडीने घ्यावा,अशी मागणी केली जात आहे.
विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. आरोपींना पाठबळ देणाऱ्या शिक्षक व संस्थेला चौकशीला सामोरे जावे लागेल. मात्र असे असताना पारनेर पंचायत प्रभारी गटशिक्षणाधिकारी विनय लाळगे यांनी प्रकरणात केलेल्या हलम जीपणामुळे हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हा सगळा प्रकार दडपण्यासाठी संस्थेने हालचाली केल्याचे लक्षात येताच हा विषय माध्यमांनी उचलून धरला. मुलीची बदनामी नको म्हणून पालक पोलिस स्टेशनपर्यंत न गेल्याने माध्यमांनी ही जबाबदारी घ्यावी लागली. वृत्त प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आदेश काढल्यानंतर पारनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विनय लाळगे हे पथकासह त्या शाळेत चौकशीसाठी गेले. मात्र तत्पूर्वी लाळगे यांना हा प्रकार माहीतच नसल्याने त्यांच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पारनेर पंचायत समितीचे आहे. या पदावर प्रथम कांतिलाल ढवळे यांची प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती, मात्र ते वादग्रस्त ठरल्याने विनय लाळगे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रकरणी त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे.