
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय आहे?
या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये एक लहान बाळाचा देखील समाविष्ट आहे. मृत्यू झालेल्यांची नावे अशी 62 वर्षीय वडील बडलूराम, साठ वर्षे आई संजू देवी, 82 वर्षे आजी शीतला आणि वीस वर्षे बहीण पार्वती. शेजाऱ्यांना जेव्हा मृतकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घरात प्रवेश केला तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या घटनेत गंभीर जखमी झालेले 40 वर्षे गुरुदेव आणि तीस वर्षे निरंकार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. निरंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लखनऊ येथील ट्रॉमा सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रामनयनसिंग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दुर्गाप्रसाद त्रिपाठी यांनी पी एस सी जवानासह गावात गाव घेतली असून तणावपूर्ण परिस्थिती पाहता सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.पोलिसांसह रात्री उशिरा फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. घराबाहेरील झुडपातून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड देखील जप्त केली आहे.
कारण काय ?
आरोपी तरुण गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीच्या वादावरून मानसिक तणावात होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे.पोलीस सध्या जखमींच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत आहेत जेणेकरून या सामूहिक हत्याकांड मागील नेमके कारण काय आहे हे समोर येईल. या घटनेने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत
Ans: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: संपत्तीच्या वादातून आरोपी मानसिक तणावात होता.
Ans: जखमींची प्रकृती स्थिर होण्याची वाट पाहत तपास सुरू आहे.