
प्रेम संबंधातून तरुणाला झाला मानसिक त्रास
बारामती पोलिसांनी केला गुन्हा दाखल
तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली फिर्याद
बारामती: बारामती शहरातील रुई परिसरात राहणाऱ्या तरुणाने प्रेम संबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, आत्महत्या पूर्वी आई मला माफ कर, मला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्या युवकाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या बहिणींसह , त्या युवतींच्या वडिलांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई, बयाजीनगर, रुई, बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विक्रमचे मामा सत्यवान अप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) या तिघां विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८,३५१(२),३५१(३),३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पैठण खुले कारागृहात कैद्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विक्रम आणि सृष्टी मते या दोघांमध्ये मागील ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, सुरुवातीला सृष्टीने विक्रमला लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर सृष्टीने आपल्या लग्नास घरच्यांचा विरोध असल्याचे सांगून लग्नास नकार दिला होता.२७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रुती या दोघींनी विक्रमला वारंवार फोन करून, ब्लॅकमेल करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच विक्रमला पुण्याला फोनवरून बोलवून, मोबाईल मधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यास सांगितले, तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी देखील केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे. विक्रमने या त्रासाला कंटाळून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सात ते पावणे आठच्या दरम्यान राहत्या घरातील किचन मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून, चिठ्ठीत आई मला माफ कर!, मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे हा निर्णय घेत आहे “असे म्हटले असून त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींचा उल्लेख देखील केला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.