
फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाला प्रवीण तरडे?
प्रवीण तरडे भाष्य करताना म्हणाला की, “मी नसरापूर सारख्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी नक्कीच एखादा सिनेमा काढेन. त्यामध्ये अशा गोष्टी दाखवेन जे पाहून कुणीही अशा कृती पुन्हा करण्याची हिम्मत करणार नाही.” प्रवीण तरडे प्रचंड रागात दिसून आला होता. तो पुढे म्हणाला “येत्या काळात देऊळबंद चित्रपटाचे किमान 11 भाग तरी मी काढणार आहे.” हे ऐकून त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच उत्साहाचे वातावरण आहे. पण त्याने हे ही सांगितले आहे की, “देऊळबंदच्या पुढील एका भागात अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावं लागणार आहे.” एकंदरीत, देऊळबंदच्या पुढील काही भागात अशा अमानवी कृत्याचा संदर्भ घेऊन चित्रपटाची कथा बनवली जाणार असल्याची चाहूल स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे, तसेच अशा अमानवी कृत्यांचा विनाश करण्यासाठी आणि या कृत्यात जोडलेल्या प्रत्येक नराधमाला शिक्षा देण्यासाठी स्वतः स्वामी अवतरणार असल्याचे क्षण या चित्रपटामध्ये दिसून येईल.
या आधी काय म्हणाला होता प्रवीण तरडे?
ज्या दिवशी पुण्यातील नरसापूर येथे एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करून तिचा खून केला त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. दिग्दर्शक प्रवीण तरडे याने पोस्ट करत सरळ त्या व्यक्तीचा Encounter करण्याची मागणी केली. पोस्ट करत तो म्हणाला, “उद्या त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे.. अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा..”
प्रवीण तरडेचा आगामी चित्रपट!
‘आता परीक्षा देवाची’ या Subtitle सह देऊळबंद सिनेमाचा दुसरा भाग 21 मे रोजी प्रदर्शित केला जात आहे. सर्वत्र महाराष्ट्रभरात हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे याने केले असून सिनेमात स्नेहल तरडे, ओम भुतकर, मोहन जोशी तसेच महेश मांजरेकर यांनी अभिनय केले आहे.