Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Jai Jai Swami Samarth Special Episode: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कथा पाहायला मिळणार आहे. या कथेत आर्थिक अडचणींमुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेला बाजी परत न आल्याने त्याची आई कांता दुःखात सापडते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 03:10 PM
Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कथा
  • बाजी समुद्रात बेपत्ता; कांता चिंतेत
  • स्वामी समर्थांच्या चरणी कांताची आर्त हाक
 

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालिकेत प्रेक्षकांसाठी काही भागांची विशेष कथा सादर होणार आहे. श्रद्धा, ममता, आक्रोश आणि स्वामीभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कथेत स्वामी समर्थांची आणखी एक अद्भुत लीला अनुभवायला मिळणार आहे.

कांताला एकच आशा उरते

पैशांची चणचण असल्यामुळे भर पावसात मासेमारीसाठी समुद्रात गेलेला बाजी परतत नाही आणि त्याच्या आईवर, कांतावर दुःखाचा डोंगर कोसळतो. बाजीशिवाय जगात आपलं असं कोणीच नसलेल्या कांताला एकच आशा उरते स्वामी समर्थ! आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी ती स्वामींच्या चरणी येते. पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. आपल्या कलर्स मराठीवर. Jai Jai Swami Samarth Special Episode:

स्वामींकडून असलेली अपेक्षा

मात्र स्वामीस्थानाच्या उंबरठ्यावरच कांताचा कपिलासोबत वाद होतो आणि हा वाद इतका विकोपाला जातो की परिस्थिती हाताबाहेर जाते. कांताच्या मनात समुद्राबद्दल निर्माण झालेला राग, मुलाच्या विरहाचं दुःख आणि स्वामींकडून असलेली अपेक्षा यामुळे तिच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू होतो.

कांताचा स्पष्ट नकार

अशातच स्वामी कांताला एक आगळंवेगळं काम सांगतात नारळी पौर्णिमेसाठी समुद्राला अर्पण करण्याचा नारळ सजवण्याचं! मात्र ज्या समुद्राने आपला मुलगा हिरावून घेतला, त्याच समुद्राला नारळ अर्पण करण्यास कांता स्पष्ट नकार देते. स्वामी आणि कांतामध्ये या हट्टाची अनोखी जुगलबंदी रंगते. दरम्यान, कांताला वारंवार बाजीचा आवाज ऐकू येऊ लागतो…“आई, माझ्यासाठी एवढं कर ना…”

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

स्वामी समर्थांची अशी लीला

हा आवाज तिच्या मनाचा भास आहे की त्यामागे खरंच काही गूढ संकेत दडले आहेत? कांताच्या हातून नारळ सजवला जाईल का? आणि तिच्या या कठीण प्रवासात कपिला कोणते अडथळे निर्माण करणार? नारळी पौर्णिमेचा दिवस उजाडतो. पण अक्कलकोटमध्ये समुद्रच नाही, मग कांताच्या हातून नारळाचं विसर्जन कुठे आणि कसं होणार? याच प्रश्नाचं उत्तर देताना स्वामी समर्थांची अशी लीला घडते, जी पाहून भक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहतील. आणि त्यानंतर… कांताच्या आयुष्यात घडणारं एक अनपेक्षित वळण तिच्या श्रद्धेला नवी दिशा देणार आहे.

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…

स्वामी समर्थ खरंच कांताची हाक ऐकतील का? बाजीचा आवाज कांतापर्यंत का पोहोचतोय? समुद्र आणि स्वामी समर्थ यांच्यात नेमकं काय नातं आहे? कांताला दिलेल्या नारळामागचं स्वामींचं गूढ काय आहे? आणि रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वावर स्वामी समर्थांच्या हातावर कोण बांधणार आहे प्रेम, विश्वास आणि रक्षणाची राखी? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा ‘जय जय स्वामी समर्थ’चा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष कथा भाग सलग चार विशेष भाग! पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Jai jai swami samarth raksha bandhan special episode takes a dramatic turn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
1

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
2

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
4

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.