मालिकेत कमळीच्या आयुष्यात शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. कमळी कायमच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांकडून मिळणाऱ्या प्रेरणेतून पुढे जात. मालिकेतील अन्नपुर्णा माविद्यालयात जे काही गैरवर्तन झाले त्यातील मुलींना चांगला मार्ग मिळण्यासाठी आणि सुजाण नागरिक होण्यासाठी कमळी कॉलेजमधील मुलींना सर्वतोपरी मदत करते. शिवरायांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यास कमळी कायमच तयार असते. याच कारणाने शिवजयंतीचं निमित्त साधत कमळी आता रायगडवारी करणार असल्याचं प्रोमोमध्ये सांगितलं आहे.
प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, कमळी रायगडावर जाते आणि शिवरायांपुढे नतमस्तक होते. कमळी शिवजयंती साजरी करण्यासाठी थेट रायगडावर पोहोचली आहे. यावेळी कमळी आवाहन करते की, “अखंड हिंदुस्थानाचे भाग्यविधाते… छत्रपती शिवाजी महाराज! चला नतमस्तक होऊन महाराजांची स्फूर्ती घेऊयात अन् शिवजयंती दणक्यात साजरी करुयात!” या प्रोमोवर नेटकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटलं की, याला म्हणतात प्रोमो आणि याला म्हणतात मालिका. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला. हा विशेष भाग येत्य़ा 17 ते 19 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
सध्या कमळी मालिकेतील या प्रोमोला नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.
याव्यतिरिक्त सांगायचं झालंच तर, TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका असून सध्या मालिकेत घडणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिसून येत आहे. एका अर्थी पाहायला गेलं तर ठरलं तर मग आणि कमळी या दोन्ही मालिकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.
‘BARC इंडिया’ने नुकतीच 31जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानची टीआरपीची आकडेवारी जाहीर केली. या यादीत अनपेक्षित आकडेवारी समोर आली. मागचे गेले कित्येक आठवडे टॉप 3 मध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांचाच बोलबाला होता. ठरलं तर मग पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका असायची. मात्र आता हे समीकरण बदललं असून आता दुसऱ्या क्रमांकावर ‘कमळी’ मालिकेने स्थान पटकावलं.






