
India deployes 12 nuclear warheads
SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप
सीप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ पर्यंत भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १९० वर पोहोचली आहे, गेल्या वर्षी ही संख्या १८० होती. यातील १२ अण्वस्त्रे भारताने तैनात केली आहेत. अहवालानुसार, भारताने एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीवरही काही अण्वस्त्रे तैनात करण्यास सुरुवात केली आहे. भारता आता थेट समुद्रातून शत्रूंवर हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र, ही बाब पाकिस्तान आणि चीनसाठी चिंताजनक ठरत आहे.
रिपोर्टनुसार, भारताडके आपले आण्विक वॉरहेड आणि त्यांना वाहून नेणारी सिस्टमी वेगवेळे ठेवतो असे सांगण्यात आले होते. परंतु यावेळी भारताने सर्व शस्त्रे संपूर्णपणे सुसज्ज ठेवली आहेत. रिपोर्टनुसार, भारता आतापर्यंत केवळ स्टॉकपाइलच्या स्वरुपात अण्वस्त्रे ठेवायचा पण पहिल्यांदाच भारताने ही तैनात केली आहेत. यामुळे भारत आपल्या संरक्षण धोरणात मोठा रणनीतिक बदल करत असल्याचे मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारताच्या अण्वस्त्र क्षमतेत वाढ करण्याचा उद्देश शस्त्रास्त्र स्पर्धा नसून संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आहे. भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आणि धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. परंतु सध्या अनेक देशांमध्ये अण्वस्त्र स्पर्धेत मोठी वाढ झाली आहे.
सध्या पाकिस्तानच्या अण्वस्त्रे क्षमतेत कोणतीही वाढ झालेली नसून त्यांच्याकडे १७० अणूबॉम्ब आहेत. अण्वस्त्र क्षमतांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर त्यानंतर चीनचा नंबर लागतो. याशिवाय ब्रिटन, रशिया, इस्रायल आणि उत्तर कोरियाने देखील अण्वस्त्रांवर मिलियन डॉलर खर्च केला आहे. रिपोर्टनुसार, सध्या जगभरातील अण्वस्त्र साठा २०२६ पर्यंत १२,१८७ वॉरहेडवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ही संख्या १२,२४१ इतकी होती.