नवाज शरीफ पाकिस्तानला वाचवणार (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. भारतीय नौदल, हवाई दल, वायुसेनेने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची स्थिती खराब केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान मैदानात उतरले असल्याचे समजते आहे.
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मैदानात उरतल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नावज शरीफ हे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या काही बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे भरतासोबत चांगले संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले व्हावेत अशी त्यांची देखील इच्छा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नवाज शरीफ हे पाकिस्तानला वाचवणार का हे पहावे लागणार आहे.
अमृतसर प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे निर्देश
भारतीय नौदल, लष्कर आणि वायुसेनेने पाकिस्तानवर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर हल्ला केला. पाकिस्तानने अमृतसर, जम्मू काश्मीर, राजस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान देशभरात मॉक ड्रिलचा आणि ब्लॅकआउटचा सराव करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अमृतसर प्रशासनाने काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. अमृतसरमध्ये या पुढे कोणतेही मॉक ड्रिल केले जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आता सायरन वाजवण्यात आला तर, तर तो थेट हल्ल्याची माहिती दर्शवेल. या प्रकारचा सायरन वाजल्यास त्वरित ब्लॅकआउट करणे अनिवार्य असेल. हल्ल्याच्या वेळेस जे निर्देश देण्यात येतील त्याचे कटकोरपणे पालन करावे लागेल असे स्पष्ट निर्देश अमृतसर प्रशासनाने दिले आहेत.
सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई
भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बीएसएफचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच 7 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत होते. सात दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र आधीपासूनच सीमेवर तैनात आणि सजग असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी या 7 ही घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.
India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा
इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
पाकिस्तानने काल दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.