
PM Narendra Modi Speech in Rajya Sabha at the Farewell Ceremony for MP delhi news
कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांसाठीच्या आभारप्रदर्शनावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण केले, यावेळी काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “मी त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो. इतका प्रदीर्घ कार्यकाळ ही काही साधी गोष्ट नाही.” त्याचप्रमाणे, उपसभापती हरिवंश हे देखील रजेवर जात आहेत. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी सभापतींना माहिती दिली की, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि उपसभापती हरिवंश यांच्यासह २५ राज्यांतील ५९ सदस्य आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.”
हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देवेगौडा, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार हे असे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी आपले अर्धे आयुष्य संसदीय कामात घालवले आहे. समाजात आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रति कसे समर्पित राहावे, हे आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. राज्यसभेमध्ये नव्याने येणाऱ्या सदस्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. अनुभवी सदस्यांकडून नवीन राज्यसभा खासदारांनी शिकले पाहिजे,” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/TV2X34E4D1 — Narendra Modi (@narendramodi) March 18, 2026
राजकारणामध्ये कधीही फुलस्टॉप नसतो
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “राजकारणात पूर्णविराम नसतो. प्रत्येक खासदाराचे सभागृहासाठी काही ना काही योगदान असते. यातील अनेक सदस्य सभागृहात परत येतील. सर्व निवृत्त होणाऱ्या खासदारांनी उत्कृष्ट योगदान दिले आहे. जे जात आहेत पण परत येत नाहीत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की, भविष्य तुमची वाट पाहत आहे आणि तुमचा अनुभव व योगदान राष्ट्राच्या जीवनात कायम राहील.सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होते आणि काही कटू-गोड अनुभवही येतात. मात्र, जेव्हा असा प्रसंग उद्भवतो, तेव्हा साहजिकच, पक्षीय मतभेद विसरून आपल्या सर्वांच्या मनात एक समान भावना निर्माण होते: की हे सहकारी आता काही दुसऱ्या विशेष कामासाठी पुढे जात आहेत,” अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : ओडिशा काँग्रेसमध्ये बंडाचा झटका! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या ३ आमदारांचे निलंबन
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नाही. केवळ निरोपाच्या उल्लेखानेच माझे डोळे भरून येतात. राजकारणातील लोक कधीही निवृत्त होत नाहीत, कधीही थकत नाहीत. प्रत्येकजण पूर्णपणे ज्ञानी नसतो. ५४ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीनंतरही मला अजून शिकायचे आहे. या सभागृहात मला अनेक सुखद आणि दुःखद अनुभव आले आहेत. जे आता जात आहेत, त्यापैकी बरेच जण परत येतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.