पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पहलगाम हल्ल्याचा आढावा (फोटो- सोशल मिडिया)
पहलगाम: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पहलगाम येथे पर्यटकांच्या एक समूहावर हल्ला केला आहे. पोलिस गणवेश परिधान करून आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली. त्यांचे ओळखपत्रे तपासली. त्यानंतर ते मुस्लिम नसल्याचे समजताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गंभीर दखल घेत, तातडीने सूत्र फिरवली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून या घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे. या प्रकरणी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश मोदी यांनी शहा यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक देखील व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्वीट काय?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.
I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected.
Those behind this heinous act will be brought…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025
बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.
महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
JK Terror Attack: ‘तो मुस्लिम नाहीये, त्याला…’; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू
दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.
भारतीय लष्कराचे पथक पहलगांम परिसरात पोहोचले असून, या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला जल आहे ते पर्यटक राजस्थानचे असल्याचे समजते आहे. पाकिस्तानचे लष्कर पप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त भाषण केले होते. त्यानंतर लगेचच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.