Indian Parliament Attack : देशाच्या संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
सभागृहाचे कामकाज ४५ मिनिटांसाठी तहकूब
आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वी संसदेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. तारीख होती 13 डिसेंबर 2001, त्या सकाळी सर्वकाही सामान्य होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले होते. संसदेचे कामकाज सुरळीत सुरू होते. त्यानंतर सभागृहाचे कामकाज ४५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेतून घराकडे पाचारण केले होते.
मात्र, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर खासदार संसदेत उपस्थित होते. तेवढ्यात जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी एका पांढऱ्या अंबेसडर कारमधून संसद भवन परिसरात घुसले. एका दहशतवाद्याने संसद भवनाच्या गेटवरच स्वत:सोबत गेटही बॉम्बने उडवले.
दहशतवाद्यांची त्याच्या गाडीला धडक
उपराष्ट्रपती कृष्ण कान्त यांची वाट पाहत त्यांचा ड्रायव्हर शेखर संसदेतीबाहेर गेट क्रमांक 11 बाहेर येण्याची वाट पाहत होता. त्यामुळे स्फोटाचा आवाज ऐकताच शेखरची नजर दुसरीकडे वळते. त्याला काही समजताच दहशतवाद्यांनी त्याच्या गाडीला धडक दिली. आणि तो खाली उतरताच त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. शेखर आपला जीव वाचवत गाडीच्या मागे लपतो.
काही वेळातच उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांनीही हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही बाजूंनी गोळीबाराचे आवाज येऊ लागले. अनावडी संसदेतूनच वाजपेयींना फोन करतात. गोळीबाराचा आवाज ऐकून लालकृष्ण आडवाणी संसद भवनातील त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले. हल्ल्याची मीहिती मिळताच अडवाणी त्यांच्या कार्यालयात परतले. आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना फोन केला. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने संसद भवनाचे दरवाजे बंद केले, त्यामुळे मोठा हल्ला टळला.
संसद भवनावर झालेल्या या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांसह 14 जण ठार झाले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हैदर उर्फ तुफैल, मोहम्मर राणा, रणविजय, हमला यांचा समावेश आहे. याशिवाय कॉन्स्टेबल कमलेश कुमार यादव शहीद झाले. संसदेत बागकाम करणारा एक माळी, दोन सुरक्षा कर्मचारी आणि दिल्ली पोलिसांचे सहा कर्मचारीही शहीद झाले.
गोळीबाराच्या आवाजाने लोकशाहीचे मंदिर हादरले
या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरू, एसएआर गिलानी आणि शौकत हुसैन यांच्यासह पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला 12 वर्षांनी फाशी देण्यात आली.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर म्हणजेच आपल्या संसदेवर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत. 13 डिसेंबर 2001 च्या पहाटे गोळीबाराच्या आवाजाने लोकशाहीचे मंदिर हादरले.
दहशत माजविण्याचा प्रयत्न
देशाच्या संसदेवर हल्ला करून दहशतवाद्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर 30 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. हे जाणून घेतल्यावर दहशतवाद्यांनी किती धोकादायक स्फोटांची योजना आखली होती, याचा विचार करता येईल.
संसदेच्या सुरक्षा सेवेचे दोन जवान शहीद
कुख्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी कसून नियोजन करून संसद भवनावर हल्ला केला होता. या पाच दहशतवाद्यांना आमच्या शूर सुरक्षा दलांनी मारले. त्याचवेळी या दहशतवादी हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे सहा आणि संसदेच्या सुरक्षा सेवेचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये संसद भवनाच्या एका माळीचाही समावेश होता.






