• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Fire Of Borderism Nrkk

सीमावादाचे अग्निदिव्य

नद्यांचे पाणी, भाषिक आधारावर राज्यांची विभागणी आणि भूमीसंदर्भातील अनेक प्रकरणांवर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद. पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील पाणीवाटप, त्याचप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणाचाही गुंता कायमच आहे. आसाम-मिझोरममधील नुकताच वाढलेला संघर्षही त्यातच आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Aug 15, 2021 | 04:13 AM
सीमावादाचे अग्निदिव्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वातंत्र्यप्राप्तींनतर अनेक आव्हानांचा सामना करीत भारत आजही हिमालयाप्रमाणे कणखरपणे जगासमोर उभा आहे. पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा करून जगासमोर कणखर नेतृत्वाची धमक दाखविणा-या इंदिरा गांधी आणि त्यानंतर  21 व्या शतकाचे निर्माते राजीव गांधी यांनी देशाला दिलेली नवी दिशा;  मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार या सर्व घडामोडीत आज भारत मुख्य अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय संस्कृतीचा जगात उदोउदो होत असतानाच तर दुसरीकडे देशात खलिस्तानी आंदोलन नेस्तनाबूत झाले;  तरी दहशतवाद आणि नक्षलवाद या समस्येसह देशात अद्यापही दोन राज्यांतील सीमावाद, पाणीवाटप वाद कायमच आहेत. राज्या-राज्यांतील वादच नव्हे तर कायदेसुद्धा एकसमान करण्याची आज गरज त्यामुळेच भासू लागली आहे. समान नागरिक कायदा हा त्यातीलच एक भाग म्हणावा लागेल.

ईशान्येकडील राज्यांचा प्रश्न ऐरणीवर

अखंड भारतात दोन राज्यांमध्ये वादविवादाची वाळवीही लागली आहे. त्यात प्रमुख मुद्दा आहे तो सीमावादाचा. एका भाग नैसर्गिक तसेच खनिज संपत्तीने विपुल आहे आणि त्याच भागावर आपला हक्क असावा म्हणून दोन राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत, याचे उदाहरण म्हणजे आसाम-मिझोराम. ईशान्य सीमेवर असलेली ही राज्य देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. वर्चस्ववादापायी बेभान झालेला चीन याच राज्यांच्या सीमापार आहे,  याचे राज्यकर्त्यांनी भान ठेवणेही गरजेचे आहे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.

अधिसूचना ठरताहेत वादाचे मूळ कारण

आसाम-मिझोराम सीमावाद ब्रिटिश काळापासून सुरू आहे. १८७५ आणि १९३३ मध्ये दोन वेगवेगळ्या अधिसूचना प्रकाशित झाल्या होत्या. मूळ वाद याच अधिसूचनेवरून आहे. 1९33 ची अधिसूचना मिझोराम सरकारला मान्य नाही. त्यावेळी राज्यासोबत चर्चाच करण्यात आली नाही, असा आरोप आहे. तर दुसरीकडे, १९३३ च्या अधिसूचनेचे आसाम सरकार समर्थन करते. विशेष म्हणजे मिझोराममधील एझवाल, कोलासिब आणि मामितची सीमा आसाममधील कछार, करिमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यानजीक आहे. आसामने कोलासिब जिल्ह्यातील काही भाग बळकावल्याचा मिझोरामचा आरोप आहे, तर मिझोरामने हैलाकांडी जिल्ह्यात अतिक्रमण केल्याचा आसामचा आरोप आहे. १९५० पूर्वी आसाममध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय मिजोराम व नागालँडचा समावेश होता. त्यानंतर ही राज्ये आसामपासून वेगळी झाली. १९७१ मध्ये त्रिपुरा, मणिपूर, मेघालय ही तीन राज्ये तर १९८७ मध्ये मिझोरामही आसामपासून वेगळे करण्यात आले. हा निर्णय मिझो आदिवासी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या कराराअंती करण्यात आला होता.

बहुतांश मुद्दे अधांतरी

नद्यांचे पाणी, भाषिक आधारावर राज्यांची विभागणी आणि भूमीसंदर्भातील अनेक प्रकरणांवर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील पाणीवाटप प्रकरण तर गेल्या कित्येक दशकांपासून अधांतरी लटकले आहेत. त्याचप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणाचाही गुंता कायमच आहे. केंद्रातील कोणतेही सरकार या मुद्यांवर तोडगा काढू शकले नाही. सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित असली तरी राजकीय हितसंबंधच मुख्य अडसर असल्याचे दिसून येते. आसाम-मिझोराम सीमावादाची समस्या तर गंभीरच बनली आहे. राजकीय स्तरावर सद्भावनेचा परिचय देत सरकारने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.  यासाठी राजकीय हित बाजूला ठेवावेच लागेल. अन्यथा अशी प्रकरणे केंद्र सरकारसाठी अग्निदिव्यच ठरेल, यात शंकाच नाही.

भान ठेवा…

भारतात ‘राजकारण अधिक आणि काम कमी’ असा जनतेचा समज आहे तो आता राज्यकर्त्यांना खोडून काढणे आवश्यक झाले आहे व ते अखंडतेच्या दृष्टीने महत्त्वाचेही आहे.  कोरोनाकाळात जेवढे आरोप-प्रत्यारोप देशात झाले त्या तुलनेत जगातील अन्य देशांमध्ये अवाक्षरही उच्चारण्यात आले नाही. कारण ‘देशच सर्वप्रथम’ ही भावनाच मुळात तेथे आहे. इथे नाही असे नाही; पण संकटकाळात देश एकजूट असणे आवश्यक आहे. नागरिक तर कित्ता गिरवतीलच पण राजकारण्यांनीही तो गिरवायला हवा.

– महेश देशकर

नागपूर

Web Title: The fire of borderism nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2021 | 04:13 AM

Topics:  

  • Independence Day Special

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.