• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Fire Of Borderism Nrkk

सीमावादाचे अग्निदिव्य

नद्यांचे पाणी, भाषिक आधारावर राज्यांची विभागणी आणि भूमीसंदर्भातील अनेक प्रकरणांवर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद. पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील पाणीवाटप, त्याचप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणाचाही गुंता कायमच आहे. आसाम-मिझोरममधील नुकताच वाढलेला संघर्षही त्यातच आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Aug 15, 2021 | 04:13 AM
सीमावादाचे अग्निदिव्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वातंत्र्यप्राप्तींनतर अनेक आव्हानांचा सामना करीत भारत आजही हिमालयाप्रमाणे कणखरपणे जगासमोर उभा आहे. पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा करून जगासमोर कणखर नेतृत्वाची धमक दाखविणा-या इंदिरा गांधी आणि त्यानंतर  21 व्या शतकाचे निर्माते राजीव गांधी यांनी देशाला दिलेली नवी दिशा;  मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार या सर्व घडामोडीत आज भारत मुख्य अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय संस्कृतीचा जगात उदोउदो होत असतानाच तर दुसरीकडे देशात खलिस्तानी आंदोलन नेस्तनाबूत झाले;  तरी दहशतवाद आणि नक्षलवाद या समस्येसह देशात अद्यापही दोन राज्यांतील सीमावाद, पाणीवाटप वाद कायमच आहेत. राज्या-राज्यांतील वादच नव्हे तर कायदेसुद्धा एकसमान करण्याची आज गरज त्यामुळेच भासू लागली आहे. समान नागरिक कायदा हा त्यातीलच एक भाग म्हणावा लागेल.

ईशान्येकडील राज्यांचा प्रश्न ऐरणीवर

अखंड भारतात दोन राज्यांमध्ये वादविवादाची वाळवीही लागली आहे. त्यात प्रमुख मुद्दा आहे तो सीमावादाचा. एका भाग नैसर्गिक तसेच खनिज संपत्तीने विपुल आहे आणि त्याच भागावर आपला हक्क असावा म्हणून दोन राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत, याचे उदाहरण म्हणजे आसाम-मिझोराम. ईशान्य सीमेवर असलेली ही राज्य देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. वर्चस्ववादापायी बेभान झालेला चीन याच राज्यांच्या सीमापार आहे,  याचे राज्यकर्त्यांनी भान ठेवणेही गरजेचे आहे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.

अधिसूचना ठरताहेत वादाचे मूळ कारण

आसाम-मिझोराम सीमावाद ब्रिटिश काळापासून सुरू आहे. १८७५ आणि १९३३ मध्ये दोन वेगवेगळ्या अधिसूचना प्रकाशित झाल्या होत्या. मूळ वाद याच अधिसूचनेवरून आहे. 1९33 ची अधिसूचना मिझोराम सरकारला मान्य नाही. त्यावेळी राज्यासोबत चर्चाच करण्यात आली नाही, असा आरोप आहे. तर दुसरीकडे, १९३३ च्या अधिसूचनेचे आसाम सरकार समर्थन करते. विशेष म्हणजे मिझोराममधील एझवाल, कोलासिब आणि मामितची सीमा आसाममधील कछार, करिमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यानजीक आहे. आसामने कोलासिब जिल्ह्यातील काही भाग बळकावल्याचा मिझोरामचा आरोप आहे, तर मिझोरामने हैलाकांडी जिल्ह्यात अतिक्रमण केल्याचा आसामचा आरोप आहे. १९५० पूर्वी आसाममध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय मिजोराम व नागालँडचा समावेश होता. त्यानंतर ही राज्ये आसामपासून वेगळी झाली. १९७१ मध्ये त्रिपुरा, मणिपूर, मेघालय ही तीन राज्ये तर १९८७ मध्ये मिझोरामही आसामपासून वेगळे करण्यात आले. हा निर्णय मिझो आदिवासी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या कराराअंती करण्यात आला होता.

बहुतांश मुद्दे अधांतरी

नद्यांचे पाणी, भाषिक आधारावर राज्यांची विभागणी आणि भूमीसंदर्भातील अनेक प्रकरणांवर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बेळगाववरून वाद, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील पाणीवाटप प्रकरण तर गेल्या कित्येक दशकांपासून अधांतरी लटकले आहेत. त्याचप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणाचाही गुंता कायमच आहे. केंद्रातील कोणतेही सरकार या मुद्यांवर तोडगा काढू शकले नाही. सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित असली तरी राजकीय हितसंबंधच मुख्य अडसर असल्याचे दिसून येते. आसाम-मिझोराम सीमावादाची समस्या तर गंभीरच बनली आहे. राजकीय स्तरावर सद्भावनेचा परिचय देत सरकारने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.  यासाठी राजकीय हित बाजूला ठेवावेच लागेल. अन्यथा अशी प्रकरणे केंद्र सरकारसाठी अग्निदिव्यच ठरेल, यात शंकाच नाही.

भान ठेवा…

भारतात ‘राजकारण अधिक आणि काम कमी’ असा जनतेचा समज आहे तो आता राज्यकर्त्यांना खोडून काढणे आवश्यक झाले आहे व ते अखंडतेच्या दृष्टीने महत्त्वाचेही आहे.  कोरोनाकाळात जेवढे आरोप-प्रत्यारोप देशात झाले त्या तुलनेत जगातील अन्य देशांमध्ये अवाक्षरही उच्चारण्यात आले नाही. कारण ‘देशच सर्वप्रथम’ ही भावनाच मुळात तेथे आहे. इथे नाही असे नाही; पण संकटकाळात देश एकजूट असणे आवश्यक आहे. नागरिक तर कित्ता गिरवतीलच पण राजकारण्यांनीही तो गिरवायला हवा.

– महेश देशकर

नागपूर

Web Title: The fire of borderism nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2021 | 04:13 AM

Topics:  

  • Independence Day Special

संबंधित बातम्या

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
1

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
2

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना
3

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉने ठोकले दमदार शतक; भारतीय संघात परण्यासाठी ठोठावले दरवाजे

Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉने ठोकले दमदार शतक; भारतीय संघात परण्यासाठी ठोठावले दरवाजे

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.