मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
गरम पाणी पिण्याचे फायदे?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेदना का होतात?
पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याचे सेवन का करावे?
महिलांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र म्हणजे प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येणे. पाळीच्या पाच दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय पोटात पेटके येणे, पोटात वेदना, कंबर दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी असंख्य समस्या उद्भवू लागतात. क्रॅम्स, कंबरदुखी आणि अस्वस्थतेमुळे रोजच्या कामात सुद्धा अडथळे निर्माण होते. पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी महिला बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन न करता आजीबाईच्या बटव्यातील उपचार करावे.(फोटो सौजन्य – istock)
पोटदुखी किंवा कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याचे सेवन करावे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत शरीरसंबंधित वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील औषध उपचार केले जात आहेत. मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी प्यावे. याशिवाय पोटात सतत क्रॅम्स येत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. यामुळे वेदना कमी होतात. गरम पाणी किंवा हॉट वॉटर बॅगने शेक दिल्यास कंबर दुखी आणि पोटात वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी प्यायल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. यामुळे पेल्विक एरियामधील रक्तभिसरण सुधारते आणि स्नायूंवर वाढलेला तणाव कमी होतो. याशिवाय आसपासच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो आणि वेदना कमी होतात. पण मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त वेदना होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे.
मासिक पाळी आल्यानंतर बऱ्याच महिलांना गॅस, पोट फुगणे आणि अॅसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या वाढू लागतात. बद्धकोष्ठता वाढल्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. यामुळे सुद्धा पोट दुखीचा त्रास होतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी प्यावे. गरम पाणी प्यायल्यामुळे पोटात वाढलेला गॅस बाहेर पडून जातो आणि पोट स्वच्छ होते.
मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीराला आवश्यक पोषण देणे सुद्धा फार गरजेचे आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
Ans: कोमट किंवा गरम पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि काही महिलांना पोटातील कळा व अस्वस्थता कमी जाणवू शकते.
Ans: कोमट पाणी प्यायल्याने काही महिलांना आराम मिळू शकतो. मात्र वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि हलका व्यायाम करणे यांसारख्या उपायांचाही उपयोग होऊ शकतो.
Ans: पुरेसे द्रवपदार्थ घेतल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र गरम पाणी हे पचनाच्या सर्व समस्यांवरील उपचार नाही.






