चाणक्य नितीमधून शिका कसे टिकवाल भावाबहिणीचे नाते
भावाबहिणीचे नाते खूप पवित्र असते. आपल्या बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे आणि आपल्या भावाचा आदर करणे हे बहिणीचे कर्तव्य आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर आपुलकीने राखी बांधते कारण तिला विश्वास असतो की काहीही झालं तरी आपल्याबरोबर आपला भाऊ भक्कमपणे उभा राहणार आहे. पण, जगात असं एकही नातं नाही ज्यात चढ-उतार नाहीत. कधीकधी चुकीची परिस्थिती आणि वेळ नात्यामध्ये अंतर निर्माण करतात.
आचार्य चाणक्य यांनीही या भावा-बहिणीच्या नात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कठीण प्रसंगी भाऊ आणि बहीण हा आधार मानला जातो, दोघांनीही आपले कर्तव्य पार पाडले नाही तर अडचणी निर्माण होतात. चाणक्य नीतीमध्ये भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा का येतो ही कारणे सांगण्याबरोबरच हे नाते कशा पद्धतीने सुधारण्यात येऊ शकते हेदेखील सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
विश्वासातील कमतरता

भावाबहिणीवरील विश्वास कमी होऊ देऊ नका
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, भाऊ आणि बहिणीचे नाते हे प्रेम आणि विश्वासावर आधारीत असते. खोटेपणाच्या पायावर कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात खोटेपणाला जागा नाही. खोटे बोलणे नाते कमकुवत करते, त्यामुळे या नात्यात विश्वासात कमतरता येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे.
हेदेखील वाचा – रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ, योग, महत्त्व
आदर आणि सन्मान

भावाबहिणीच्या नात्याचा आदर ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या मते, भावा-बहिणीच्या नात्यामध्ये आदर सर्वात महत्त्वाचा असतो. भाऊ आणि बहीण दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. पण जेव्हा ते कमी व्हायला लागते तेव्हा नातं कमकुवत व्हायला लागतं. याशिवाय एकमेकांच्या जवळ भावनिक आणि मानसिकदृष्ट्या नसल्यामुळे दुरावा निर्माण होऊ लागतो. म्हणून कितीही भांडलात किंवा रागावलात तरीही आदर आणि सन्मान कमी होऊ देऊ नका.
प्रेम आवश्यक

नात्यामध्ये प्रेम असणे अत्यंत गरजेचे
भाऊ-बहीण हे भांडतातच. कोणत्याही भावाबहिणीच्या नात्यात भांडणं झाली नाहीत असं कधीच ऐकू येणार नाही. कितीही भांडत असले तरी त्यांच्यात प्रेमाची कमतरता भासू नये. अशा स्थितीत आचार्य चाणक्य म्हणतात की जर भाऊ-बहिणीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम नसेल आणि एकमेकांना साथ दिली नाही तर असे नाते ओझे बनते, त्यामुळे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका.
हेदेखील वाचा – राखी बांधण्यापूर्वी बहिणींनी ‘हे’ काम करावे, जाणून घ्या उपाय
वाईट काळात साथ

वाईट काळात द्यावा भावाबहिणीने एकमेकांना आधार
भाऊ-बहिणीच्या अनमोल नात्याची परीक्षा वाईट काळातच होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे, जर भाऊ-बहीण सुख-दुःखात एकमेकांना साथ देत नसतील तर त्यांचे नाते टिकून राहत नाही. गरज असताना तुम्ही मदत करू शकत नसाल तर असे नाते जोडण्यात काही अर्थ नाही.






