
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल
वजन कमी करण्यासाठी उपाय?
मध खाण्याचे फायदे?
शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी मध कशा पद्धतीने खावे?
जगभरात लठ्ठपणा, मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर पोटावर अनावश्यक चरबीचा घेर वाढण्यास सुरुवात होते. हा चरबीचा घेर शरीरासाठी घातक ठरतो. वाढलेल्या वजनाकडे वेळीच लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते वेळीच कमी करणे आवश्यक आहे. शरीरावर किंवा पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी तासनतास जिम केली जाते तर कधी महागडी डाएट, सप्लिमेंट्स घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण चुकीचा डाएट केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. याशिवाय सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होते. त्यामुळे कायमच नैसर्गिक पद्धतीने वाढलेले वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असते. मधाचा वापर फारसा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जात नाही. आयुर्वेदामध्ये मध अतिशय औषधी मानले जाते. सर्दी खोकला किंवा लहान मुलांना ताप आल्यानंतर मध खाण्यास दिले जाते. मधामध्ये असलेले शक्तिशाली गुणकारी घटक शरीर सुधारण्यास मदत करतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि फेनोलिक तत्व शरीर आतून मजबूत करण्यास मदत करतात. मधाचे या पद्धतीने सेवन करून तुम्ही महिनाभरात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करू शकता. शरीर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. शरीरात जमा झालेली अनावश्यक घाण बाहेर पडून गेल्यास संपूर्ण शरीर स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते.
एक ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध मिक्स करून प्यावे. रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य चांगले राहील. यामध्ये असलेले घटक मेटाबॉलिक रेट बुस्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पेय अतिशय उत्तम आहे. या पेयाच्या सेवनामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. यासाठी वाटीमध्ये दालचिनी पावडर घेऊन त्यात मध मिक्स करून प्यावे. तसेच दालचिनीचे पाणी बनवून सुद्धा पिऊ शकता. यामुळे शरीरात जमा झालेली चरबी जळून जाण्यास मदत होईल. हे पाणी सकाळच्या नाश्त्याच्या आधी किंवा रात्री झोपण्याच्या आधी प्यावा.
Ans: डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि फळे.
Ans: तज्ञ सहसा दर आठवड्याला ०.५ ते २ पौंड (सुमारे ०.२ ते ०.९ किलोग्रॅम) वजन कमी करण्याचा सल्ला देतात. हे सुरक्षित आणि शाश्वत आहे.
Ans: रात्री उशिरा जास्त खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवण करणे योग्य आहे.