
मासिक पाळी लवकर जाण्याचे कारण (फोटो सौजन्य - iStock)
मुळात सध्या अनेक महिलांना वयाच्या आधीच सध्या पाळी थांबण्याचा त्रास होतो आहे. अनेक महिलांना चुकीच्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे महिलांना या समस्यांना सामोरं जावं लागतंय. मात्र त्याचा दुष्परिणाम शरीरावर अधिक होताना दिसून येत आहे.
२२ वर्षीय महिलेची मासिक पाळी थांबली
प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यांनी स्पष्ट केले की, २२ वर्षीय एक महिला अलीकडेच तिच्याकडे आली आणि तिला सांगितले की तिला गेल्या वर्षभरापासून मासिक पाळी येत नाही. यामुळे, ती खूप काळजीत होती आणि तिला आश्चर्य वाटले की जर तिची मासिक पाळी येत नसेल तर गर्भधारणा कशी शक्य होईल. मुळात गर्भधारणा होण्यासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत मासिक पाळी येणे गरजेचे आहे. १ वर्ष पाळीच न आल्यामुळे ही रूग्ण अत्यंत चिंतेत होती. मात्र असे नक्की का घडले हे कळत नव्हते. याचे कारण तज्ज्ञांनी योग्य तपासणी करून सांगितलं.
मासिक पाळी सुरू करण्यासाठी औषधेदेखील
सदर महिला गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही योग्य चाचणीशिवाय तिच्या मासिक पाळी सुरू करण्यासाठी औषधे घेत होती. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तिने हे पाऊल उचललं होतं. तिची मासिक पाळी का थांबली आणि त्यामागील खरे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
इतकंच नाही तर डॉक्टरांकडून दर महिन्याला, कारण न समजता, तिला फक्त एक नवीन टॅब्लेट दिली जात असे. याशिवाय सदर रूग्णाची AMH पातळी फक्त ०.०१ होतीजेव्हा अहवाल आला . तेव्हा क्लिनिकमध्ये काही काळ शांतता पसरली होती. खरं तर, महिलेची एएमएच पातळी फक्त ०.०१ होती, जी गर्भाशयातील रिझर्व्ह खूपच कमी असल्याचे दर्शवते आणि त्यामुळेच तिला मासिक पाळी येणं बंद झालं होतं.
अंडी साठा जवळजवळ कमी झाला
ही केवळ एक आकडेवारी नव्हती, तर महिलेची कठोर वास्तविकता होती. याचा अर्थ असा होता की तिच्या गर्भाशयातील अंड्यांचा साठा जवळजवळ कमी झाला होता. यामुळेच तिची मासिक पाळी थांबली होती आणि तिचे हार्मोनल संतुलन पूर्णपणे बिघडले होते. म्हणूनच या समस्येवर काम करण्यात आले असे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे तुम्हाला कमी वयात मासिक पाळीच्या समस्या उद्भवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा अन्यथा आई होण्याचे सुख तुम्हालाही मिळू शकणार नाही.
पहा व्हिडिओ