पावसाळा म्हटले की सर्वात अडचण होते ती कपडे वाळवण्याची. अशावेळी बाहेरच्या चिखलामुळे कपडे खाराब होणे टाळता येत नाही आणि हवेतल्या आद्रतेमुळे वाळतही नाहीत. विशेषतः शहरांमध्ये असलेल्या छोट्या जागेमुळे कपडे वाळवायला जास्त अडचण येते. परिणामी कपड्यांना दुर्गाधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा आणि पावसाळा अधिक आनंददायी बनवा.
कपडे वाळण्यासाठी पाणी निथळणे महत्त्वाचे आहे. कारण त्यात पाणी असेल तर वाळणे मुश्किल होते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले असतील तर दोनवेळा ड्राय मोडवर फिरवून घ्यावेत. हाताने घातले असतील तर वाळत घालण्याआधी कपड्यातील पाणी निथळून घ्या आणि शक्यतो जमेल झटकून वाळत घाला.
कापडे 90 टक्के वाळले असतील तर ते घरात वाळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. अशावेळी ते कपडे हॅंगरला लावून फॅनखाली ठेवा. मात्र 90. टक्के वाळलेले असतील तरच आत आणा. ज्या कपडे खोलीत कपडे वाळत घातले आहेत त्याची सर्वखिडक्या, दारे उघडी ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहतील.
कपडे खूप असतात आणि जागा कमी असते त्यावेळी हॅंगरचा वापरता करतात विशेषतः छोटे कपडे आणि आगरला टांगून अडकवता येतील. यामुळे त्यांची जागा मोठ्या कपड्यांना वापरायला मिळते.
अनेकदा ओलसर कपडे सुखण्याच्या आधी घडी करून कपाटात ठेवले जातात किवा कपडे खोलीत ठेवले जातात त्यामुळे कुमट वास येतो. अशावेळी कपडे असणाऱ्या खोलीत धूप लावून ठेवा. त्यामुळे कपड्यांना सुगंध येत राहील. मात्र. धूप कपड्याजवळ लावू नका त्यामुळे आगीसारखे दुर्घटना घडू, शकते. याशिवाय मीठ खडे एका कोपऱ्यात ठेवले तरही दुगंध कमी येतो. मीठ आद्रता शोषूण घेत असल्यामुळे हवा कोरडी राहण्यास मदत होते.