
ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम
मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
दैनंदिन आहारात होणारा बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता, जंक फूड, कोणत्याही वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागते. वाढत्या बद्धकोष्ठतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याध होण्याची शक्यता असते. लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणालाही मूळव्याध होऊ शकतो. फायबरची कमतरता, पाण्याचे कमी सेवन, तासनतास एका जागेवर बसून राहणे या चुकीच्या सवयी शरीरास धोका निर्माण करतात. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वारातील रक्तवाहिन्यांना सूज येते. डॉक्टरांच्या मते, एका जागेवर तासनतास बसून राहिल्यामुळे खालच्या भागातील रक्ताभिसरण मंदावते आणि रक्तवाहिन्या फुगतात.(फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठता झाल्यानंतर शौचास जास्त जोर लावावा लागतो, ज्याच्या परिणामामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येऊन रक्त पडणे किंवा मोड बाहेर येण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा मूळव्याध झाल्यानंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. पण ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा एकदा मूळव्याध होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑपरेशन न करता मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. आहारात फायबर वाढवणे, भरपूर पाणी पिणे आणि नियमित व्यायाम केल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळू शकते.
दैनंदिन आहारात ओट्स, नाचणी, पालेभाज्या, आणि फळे इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांची हालचाल कायमच सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित दही, ताक आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करावे. तसेच दिवसभरात ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होण्यासाठी रात्री अंजीर पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी खावेत.
Ans: मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळील शिरा सुजणे. यामुळे वेदना, जळजळ, खाज किंवा रक्तस्राव होऊ शकतो.
Ans: होय. फायबरयुक्त आहार घेतल्याने मल मऊ राहतो आणि शौचास त्रास कमी होऊन मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
Ans: तिखट, तेलकट, जंक फूड आणि कमी फायबर असलेले पदार्थ टाळणे आवश्यक असते.