Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी
वर्षाच्या बाराही महिने शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजार सगळीकडे पसरू लागतात. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. त्यातील अतिशय जीवघेणा आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू हा केवळ ताप नसून कोणत्याही क्षणी मृत्यू होणारा गंभीर आजार आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराची लागण होते. एडीस या मादी डासाच्या चाव्यामुळे शरीरात व्हायरल इन्फेक्शन पसरते. याशिवाय डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन जातात. व्हायरल इन्फेक्शन वर्षानुवर्षे शरीरात कायम राहिल्यास आणखीनच गंभीर होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यूची लक्षणे? डेंग्यू ताप किती दिवस शरीरात राहिल्यास मृत्यू होऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
डेंग्यू झाल्यानंतर शरीराचे कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. हा आजार एडीस दास चावल्यामुळे होतो. हा डास चावल्यानंतर ४ किंवा ५ दिवसांनी ताप येतो. ताप, अंगदुखी, उलट्या इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. डेंग्यू झाल्यानंतर योग्य वेळी उपचार केल्यास ७ ते १० दिवसांमध्ये पूर्णपणे बरे वाटते. पण शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त कमकुवत होऊन जाते.
डेंग्यूचा डास चावल्यानंतर ४ किंवा ५ दिवसांनी अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि त्वचेवर लाल पुरळ येणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. या अस्वस्थेला “ब्रेक बोन फीव्हर” असे सुद्धा म्हणतात. शरीरामध्ये हाडे तुटल्यासारख्या वेदना होणे, खाल्ले अन्नपदार्थ पोटात टिकून न राहणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच डेंग्यूच्या दुसऱ्या टप्प्यात शरीरात पाण्याची कमतरता, शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवू लागतात. शरीरातील पांढऱ्या पेशींची पातळी कमी झाल्यानंतर नाका तोंडातून रक्त येण्याची शक्यता असते. यामुळे काहीवेळा मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे डेंग्यू झाल्यानंतर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
डेंग्यू झाल्यानंतर अनेक लोक खूप जास्त हल्ल्यात घेतात. पण असे न करता योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. डेंग्यू अतिशय तीव्र झाल्यानंतर सतत उलट्या होणे, उलटीमध्ये रक्त, पोटात तीव्र वेदना, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स खूप कमी होतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते.
डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्वचा काळी पडणे, वजन अचानक कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास पुरेसे पाणी, नारळपाणी, सूप किंवा इलेक्ट्रोलाइट घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो.
Ans: ताप आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल घेऊ शकता.
Ans: होय, डेंग्यूच्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंपैकी एकाचा संसर्ग झाल्यावर इतर प्रकारच्या विषाणूंमुळे पुन्हा डेंग्यू होऊ शकतो.
Ans: डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे. डास चावणार नाहीत याची काळजी घ्या, जसे की मच्छरदाणीचा वापर करणे किंवा डास प्रतिबंधक उत्पादने वापरणे.






