शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास रक्ताचे होईल पाणी, उद्भवतील गंभीर समस्या
कावीळ होण्याची कारणे?
कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?
वातावरणात होणारे बदल, आहारात निर्माण झालेली पोषणाची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वारंवार जंक फूड किंवा अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. लिव्हरसबंधित अतिशय धोकादायक आजार म्हणजे कावीळ. कावीळ झाल्यानंतर लगेच शरीरात लक्षणे दिसून येत नाही. पण काही दिवसांनंतर लक्षणे अतिशय गंभीर होतात. अनेक लोक केवळ डोळे पिवळे झाले म्हणून कावीळ झाली आहे, असे समजतात. पण कावीळ झाल्यानंतर शरीरात इतरही लक्षणे दिसू लागतात, ज्याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)
कावीळ झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा जीवावर बेतू शकते. कावीळ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हिपॅटायटिस, अस्वच्छ पाणी किंवा अन्नामुळे जंतू संसर्ग, जास्त प्रमाणात दारूचे सेवन, पित्तनलिकेत अडथळा आणि लाल रक्त पेशी वेगाने तुटल्यामुळे कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. कावीळ सारख्या गंभीर आजारावर वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण शरीरात कावीळ पसरते. चला तर जाणून घेऊया कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे.
कावीळ झाल्यानंतर शरीरात बिलीरुबिन नावाचा पिवळा पदार्थ झपाट्याने तयार होतो. जास्त प्रमाणात तयार झालेल्या बिलीरुबिनमुळे लाल रक्तपेशी तुटून जातात. याशिवाय पिवळा पदार्थ वेळीच बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात साचून राहतो, ज्याच्या परिणामामुळे लघवीच्या रंगात बदल दिसू लागतात. लघवीचा रंग गडद पिवळा होऊन लघवी करताना जळजळ होते.
कवीला झाल्यानंतर भूक कमी होऊ जाते. याशिवाय अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर मळमळ किंवा उलट्या होतात. त्यामुळे वारंवार मळमळ होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय कावीळ झाल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होतात आणि सूज आल्यासारखे वाटते. तसेच वेदना, सूज किंवा अस्वस्थता जाणवून आरोग्य बिघडून जाते.
लघवीच्या रंगात बदल होण्यासोबतच डोळे, त्वचा आणि नख सुद्धा पिवळी होण्यास सुरुवात होते. शरीरात खूप जास्त बिलीरुबिन वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. याशिवाय कोणतेही काम न करता खूप जास्त थकवा, अशक्तपणा, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.
Ans: त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे, लघवीचा रंग गडद होणे, थकवा, भूक कमी होणे, मळमळ आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: ‘रक्ताचे पाणी होणे’ हा वैद्यकीयदृष्ट्या अचूक शब्द नाही. कावीळमध्ये रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. त्यामागील कारणानुसार यकृत, पित्तनलिका किंवा लाल रक्तपेशींशी संबंधित समस्या असू शकतात.
Ans: स्वच्छ पाणी व अन्नाचे सेवन, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित आहाराच्या सवयी आणि कावीळ निर्माण करणाऱ्या कारणांपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.






