
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे?
मासिक पाळीच्या चक्रात कशामुळे बिघाड होतो?
मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी घरगुती उपाय?
मासिक पाळी येणे ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातील ४ ते ५ दिवस महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. या बदलांच्या परिणामामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी येणे ही शारीरिक क्रिया नसून महिलांच्या शरीराचा आरसा आहे. मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांचे असते. काहींना मासिक पाळी वेळेच्या आधीच येते तर काहींना मासिक पाळी तारीख होऊन गेल्यानंतर खूप उशिराने येते. प्रत्येक महिलेच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. मासिक पाळी वेळेत हे येणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पण बऱ्याचदा शरीरात होणारे छोटे मोठे सामान्य बदल धोक्याचे नसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी किती दिवस उशिरा येणारे सामान्य समजावे? मासिक पाळी वेळेत येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
अनेकदा मासिक पाळी ठरलेल्या तारखेच्या दिवशी न येते काहीवेळा खूप जास्त उशिरा येते. प्रत्येक महिन्याला मासिक पाळी उशिरा येणे हे नॉर्मल असले तरीसुद्धा काहीवेळा शरीरात होणाऱ्या मोठ्या बदलांचे संकेत आहेत. मासिक पाळी प्रत्येक महिन्याला २ ते ३ दिवस जर उशिरा येत असेल तर हे सामान्य असू शकते. आहारात होणाऱ्या बदलांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल बदल, मानसिक ताण, प्रवास, खाण्यापिण्याच्या सवयीं आणि शरीरास आवश्यक असलेली झोप न घेतल्यास मासिक पाळी खूप जास्त उशिरा येते. यामुळे मासिक पाळीचे चक्र विस्कळीत होऊ शकते. जर तुमची मासिक पाळी ७ ते १० दिवस उशिरा येत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. पण प्रत्येक महिन्याला मासिक पाळी उशिरा येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. तणाव वाढल्यामुळे शरीरातील ‘कोर्टिसोल’ नावाच्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. याचा परिणाम ओव्हुलेशन प्रक्रियेवर लगेच दिसून येतो. थायरॉईड किंवा PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना मासिक पाळी कधी लवकर येते तर कधी उशिरा येते. याशिवाय कोणत्याही गोळ्या आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची शक्यता असते.
विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी
मासिक पाळी नियमित येण्यासाठी आहारात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ आणि फॉलिक ॲसिडचा समावेश करावा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. तसेच रोजच्या आहारात पपई, अननस, आल्याचा चहा किंवा हळदीच्या दुधाचा समावेश करावा. हळदीचे दूध प्यायल्यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना होत असतील तर हलका व्यायाम, चालणे किंवा योगासने केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. तसेच दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गूळ आणि शरीर उष्ण ठेवणारे पदार्थ खावेत.
Ans: बहुतेक मुलींना वयाच्या १२ व्या वर्षाच्या आसपास पहिली पाळी येते, पण हे वय १० ते १५ वर्षे असू शकते.
Ans: साधारणपणे, मासिक पाळीचा कालावधी ३ ते ७ दिवसांचा असतो.
Ans: तणाव, PCOD/PCOS, थायरॉईड, वजन बदलणे, किंवा गर्भधारणा ही प्रमुख कारणे असू शकतात.