
वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात असंख्य बदल होतात. मात्र हे बदल महिलांच्या शरीरात खूप जास्त दिसून येतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, अचानक मासिक पाळी बंद होणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना तर काहीवेळा शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढी लागतो. याशिवाय चेहऱ्यावर येणारे अनावश्यक केस, त्वचा रखरखीत, कोलोजनची पातळी कमी होणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो. वय वाढल्यानंतर महिलांनी स्वतःची आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांमधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
४० व्या वर्षानंतर शरीरातील कोलोजनची पातळी कमी कमी होत जाते. कोलेजन कमी झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, ऍक्ने, बारीक रेषा येऊन त्वचा सैल होण्यास सुरुवात होते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतात. महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे काही काळापुरतीच त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी दिसते. पण कालांतराने त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. केमिकल युक्त स्किन ट्रीटमेंट सूट न झाल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वाढत्या वयात कायमच फिट आणि हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे केवळ शरीराचं नाहीतर त्वचा आणि केसांच्या आरोग्याला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. शारीरिक हालचाल केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. व्यायाम केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यासोबतच वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारते.
वय वाढल्यानंतर त्वचेची खूप जास्त काळजी घेणे फार आवश्यक आहे. आहारात विटामिन सी असलेल्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय लिची, संत्री बेरीज, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. तर सोयाबीन, डाळी, बीन्स, नट्स, शतावरी, मशरूम, पालक इत्यादी पदार्थ रोजच्या जेवणात खावे. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या बियांचे आणि सुका मेव्याचे सेवन करावे.
शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचा खूप जास्त फ्रेश आणि चमकदार दिसते. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरूम कमी होण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेली घाण आणि रक्त शुद्ध करण्यासाठी पाण्यासोबतच डिटॉक्स पेयांचे सुद्धा सेवन करावे. डिटॉक्स पेय शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करतात.
मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर
डेली रूटीनमध्ये स्किन केअर फॉलो करायला अजिबात विसरू नका. स्किन केअर रुटीनमध्ये क्लिंजिनंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग करणे फार आवश्यक आहे. यामुळे त्वचा खूप फ्रेश आणि चमकदार दिसते. स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही १० टक्के विटामिन सी सीरमचा वापर करू शकता. पण त्वचा कायमच चमकदार आणि हेल्दी हवी असेल तर शुगर असलेल्या पेयांचे अजिबात सेवन करू नये.