गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून ते बाळ 1 वर्षांचं होईपर्यंत सरकार थेट कॉलवरुन तुम्हाला आरोग्याबाबत सेवा देणार आहे. या आरोग्य सेवेचं नाव आहे किलकारी योजना. ही किलकारी सेवा नक्की काय आहे आणि याचा काय फायदा होणार याबाबत माहिती घेऊयात.
किलकारी योजनेची नोंदणी कशी करावी ?
सर्वात पहिले गर्भवती महिलेने सरकारी आरोग्य केंद्रामध्ये आपण गर्भवती असल्याची नोंदणी करावी. ही नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक केंद्रावर द्यावा. हा नंबर दिल्यानंतर सरकारी केंद्रातून दर आठवड्याला एक कॉल येतो.
या योजनेचा नेमका फायदा काय ?
गर्भवती राहिल्यानंतर महिलांना अनेक प्रश्न पडतात. या फोन कॉल्सच्या मदतीने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. असं असलं तरी हा प्रश्न कायम राहतो की दर आठवड्याला हा कॉल नेमकं करतं तरी कोण ? तर 01244451660 या क्रमांकावरून हे कॉल येतात. भारत सरकारच्या किलकारी सेवेअंतर्गत गर्भवती महिलांना या नंबरवरून प्रसूतीसंदर्भात सर्व प्रकारचे योग्य मेसेज दिले जातात आणि तेदेखील विनाशुल्क दिलं जातं.
सर्वात महत्वाचं म्हणजे चौथ्य़ा महिन्यापासून ते बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत तुमच्या आरोग्यासाठी काय महत्वाचं आहे त्याबाबत तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं.
कोणत्या विषयावर सल्ले दिले जातात ?
कोणत्या विषयावर सल्ले दिले जातात जाणून घेऊया
गर्भावस्था
स्वतःचे आणि मुलांचे पोषण आईचे आरोग्य कसे ठेवायला हवे बाळांना देण्यात येणारे लसीकरण नवजात बाळाचा संगोपन कसे करावे ? तसंच आरोग्य तपासणी कधी आणि कशी करावी याबाबत योग्य माहिती दिली जाते. किलकारी योजनेमुळे मॉडर्न आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल.






