
ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार
Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका
ढगांशी संवाद साधतो हा किल्ला
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला भारताच्या ऐतिहासिक वैभवाचा एक जिवंत पुरावा आहे. समुद्रतळापासून 3,389 फूट उंच या किल्ल्याला Iron Fort या नावानेही ओळखले जाते. प्राचीन इतिहास आणि अद्भूत वास्तुकला यामुळे पर्यटकांमध्ये हा किल्ला नेहमीच लोकप्रिय असतो.
अनेक राजवटींचा साक्षीदार राहिलाय
लोहगड किल्ल्याचा इतिहास फार जुना आणि अनेक राजवटींशी जोडलेला आहे. सर्वात आधी 10 व्या शतकात लोहतमिया राजवंशाने या किल्ल्याची बांधणी केली. यानंतर काळासोबतच या किल्ल्यावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मुघल आणि मराठा साम्राज्यांनी राज्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – 1648 मध्ये, छत्रपति शिवाजी महाराज यांनी किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपल्या बुद्धीच्या जोरावर किल्ल्याला काबीज केले. तथापि 1665 च्या पुरंदरच्या तहानुसार त्यांना हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. परंतु 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा मुघलांकडून हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. सुरत मोहिमेतून आणलेला खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याचा तेव्हा वापर केला जात होता.
पेशवांचा काळ – नंतर पेशवा काळात लोकप्रिय नेता नाना फडणवीस यांनी येथे आश्रय घेतला. त्यांनी त्याकाळात किल्ल्यावर एक मोठी पाण्याची टाकी आणि पायाऱ्यांची विहिर बांधली जी आजही किल्ल्यावर अस्तित्वात आहे.
अद्भूत आहे वास्तुकला
लोहगड किल्ल्याची बांधणी आणि लष्करी रचना फार अतुलनीय आहे. किल्ल्यात एकूण चार प्रवेशद्वार आहेत ज्यात गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महा दरवाजा यांचा समावेश होतो. हे चारही द्वार किल्ल्यात आजही असून यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. किल्ल्यात एक विंचू कडा नावाने जागा आहे जिथून किल्ल्याच्या मुख्य भागांमध्ये प्रवेश करता येते. ही जागा खरोखर एका विंचूच्या डंकासारखी दिसते. इथून सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर आणि मनमोहक दृष्य पाहायला मिळते.
पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या
लोहगढला कसे जावे?