
Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
कलिम्पोंग
कलिम्पोंग हा पश्चिम बंगाल राज्यातील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. डोंगर, शांत वातावरण आणि इथल्या निसर्गसाैंदर्यासाठी हे ठिकाण प्रामुख्याने ओळखले जाते. पावसाळ्यात इथले दृष्य पाहायला तर सुंदर दिसतात परंतु याकाळात इथे भूस्खलनाचा धोका असल्याने जीवाचा धोका फार वाढतो. यामुळेच मान्सूनमध्ये या ठिकाणी चुकूनही जाऊ नये.
आसाम
आसाममध्ये चहाचे मळे, नैसर्गिक साैंदर्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती पाहायला मिळते. जुलै महिन्यात इथे भरपूर पाऊस वाढतो. याकाळात डोंगराळ भागात ट्रिप न करण्याचा सल्ला दिला जातो. आसामच्या अधिकतर भागात पावसाळ्याच्या काळात पूर आणि भूस्खलनाचा धोका फार वाढतो ज्यामुळे याकाळात चुकूनही न जाण्याचा सल्ला दिला जातो.
हिमाचल
हिमालयाच्या कुशीत वसलेले हे राज्य तिथल्या नयनरम्य दृष्यांसाठी ओळखले जाते. कपल्स, फॅमिली किंवा सोलो ट्रिपसाठी हे राज्य एक चांगला पर्याय मानले जाते. पावसाळ्याच्या काळात डोंगराळ भागातून या राज्याची सैर करण्याचा विचार चुकूनही करु नका. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.
भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…
ऋषिकेश
गंगा नदीच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. इथे पर्यटकांसाठी अनेक व्हाॅटर स्पोर्ट्स एक्टिव्हिटीज सुप्रिसिद्ध आहेत. परंतु पावासळ्याच्या काळात या एक्टिव्हिटीज करण्यावर बंदी घातली जाते. याकाळात इथे नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढते. जुलै महिन्यात या ठिकाणी जाऊ नका.