
17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या
Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
कुठे आहे ही हवेली?
या हवेलीचे नाव आहे चोमू पॅलेस जे जयपूरपासून एनएच-११ वर सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर वसले आहे. हे महल आता एका हाॅटेलच्या स्वरुपात ओळखले जाते. याच्या इतिहासाविषयी बोलणं केलं तर, हा पॅलेस सुमारे ३५० वर्षांहून अधिक जुना आहे. जयपूरपासून राजघराण्याचे वंशज असलेल्या राव गोपालजींनी १५५० च्या दशकात या राजवाड्याची बांधणीला सुरुवात केली होती. मूळतः उमराव आणि सेनापतींसाठी एक तटबंदीयुक्त निवासस्थान म्हणून बांधलेल्या या भव्य राजवाड्याचे, कालांतराने एका आलिशान हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर झाले.
कोणकोणत्या चित्रपटांची शूटिंग पार पडली आहे?
बाॅलिवू़च्या अनेक चित्रपटांची शूटिंग या हवेलीमध्ये करण्यात आली आहे. सर्वप्रथम, १९९६ मध्ये ‘लोफर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी चोमू पॅलेसचा वापर करण्यात आला होता. नंतर २००७ साली अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट इथे शूट करण्यात आला. यानंतर २००९ साली ‘गुलाल’ या चित्रपटाचे शूटिंग देखील याच महलात पार पडले. त्यानंतर २०११ साली ‘क्वीन’ या चित्रपटात चौमुन पॅलेस दिसला आणि अजय देवगणच्या ‘बोल बच्चन’ या चित्रपटाचे चित्रीकरणही चौमुन पॅलेसमध्ये झाले होते. आता ‘भूत बंगला’मध्ये हा राजवाडा भुताचा वाडा बनवण्यात आला आहे.
भारताची जादुई ट्रेन… 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड
मुंबईहून चोमू पॅलेसला कसे जायचे?
विमान : मुंबईहून विमानाने पॅलेसला जाण्याचा पर्याय सर्वात जलद पर्याय ठरेल. जयपूर विमानतळावरून, चोमू पॅलेसपर्यंतच्या शेवटच्या ३०-४० किमी (अंदाजे १ तास) प्रवासासाठी टॅक्सी भाड्याने घ्या किंवा खाजगी कार बुक करा.
रेल्वेने: बजेट कमी असेल तर रेल्वेचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. यासाठी मुंबई सेंट्रल (MMCT) किंवा बांद्रा टर्मिनस (BDTS) येथून जयपूर जंक्शन (JP) पर्यंत ट्रेन करा. जयपूरहून चोमू पॅलेसपर्यंत जाण्यासाठी स्थानिक टॅक्सी किंवा कॅब करावी लागेल.
बसने: मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी पेटीएम किंवा खाजगी ट्रॅव्हल्ससारख्या सेवांद्वारे थेट बस सेवा उपलब्ध आहेत (अंदाजे २७-२८ तास), त्यानंतर स्थानिक टॅक्सीचा पर्याय आहे.