
वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सर्वच महिलांसह पुरुषांना आपली त्वचा कायमच मुलायम, चमकदार,डाग विरहित, टवटवीत आणि फ्रेश हवी असते. चेहऱ्यावर कोणतेही डाग किंवा चिकटपणा नसल्यास मेकअप केल्यानंतर तो दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतो. पण वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेच्या समस्या वाढू लागतात. पूर्वीच्या काळी वयाच्या ४० व्या वर्षानंतर उद्भवणाऱ्या समस्या हल्ली तरुण वयातच निर्माण होऊ लागल्या आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा टॅन झाल्यासारखी वाटणे, चेहऱ्यावर मोठे पिंपल्स इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने त्वचेच्या समस्या वाढतात आणि चेहरा खूप जास्त थकल्यासारखा वाटतो. चेहऱ्यावरील तेज कमी झाल्यानंतर कितीही मेकअप केला तरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचा टवटवीत आणि ताजीतवानी ठेवण्यासाठी या टिप्स आवर्जून फॉलो कराव्यात. यामुळे वयाच्या तिशीनंतर सुद्धा त्वचेच्या कोणत्याच समस्या उद्भवत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वर्षाच्या बाराही महिने चेहऱ्यावर नियमित सनस्क्रीन लावावे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावावे. घरात असताना किंवा घरातून बाहेर जाताना कायमच सनस्क्रीन लावावे. चेहऱ्यावर न लावल्यास त्वचा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. त्वचेमध्ये वाढलेला ओलावा वाढवण्यासाठी आणि निर्जीव झालेली त्वचा पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. SPF 50 आणि PA++++ असलेल्या सस्क्रीनचा वापर त्वचेसाठी करावा.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी चेहरा हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त सुकल्यासारखी वाटते. याशिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स सुद्धा येतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. नियमित ४ ते ५ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात ओलावा टिकून राहतो. पाण्यासोबतच विटामिन सी युक्त पेयांचे सेवन करावे. याशिवाय नियमित मॉइश्चरायजरचा वापर करावा.
बदलते हवामान, धूळ, माती आणि प्रदूषणाच्या दीर्घकाळ सानिध्यात राहिल्यामुळे त्वचा काळी होऊन जाते. चेहऱ्यावर डेड स्किन जमा झाल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि टॅन होते. त्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित रात्री झोपण्याआधी विटामिन सी सिरमचा वापर करावा. अवेळी येणारा वयस्करपणा रोखण्यासाठी विटामिन सी सिरमचा वापर करावा.
त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी काही लोक नियमित स्क्रब करतात. पण नियमित स्क्रब केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊ शकते. चेहऱ्यावर लाल रॅश, डाग येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. त्यामुळे स्क्रब करण्यासाठी बाजरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही क्रीमचा वापर न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो.