हजारो वर्षांपूर्वी या घराण्याने दक्षिण भारतीय साम्राज्याने समुद्रावर राज्य प्रस्थापित केलं. भारताचा दाक्षिणात्य भाग हा समुद्राने वेढलेला. त्यामुळे भौगौलिक वातावरण तसंच असल्याने या चोळ घराण्याचा मूळ व्यवसाय हा जहाजबांधणीचा. चोळ उत्कृष्ट जहाजे तयार करत. चोळ फक्त चांगले व्यापारीच नव्हते तर युद्ध कलेत पारंगत देखील होते. जहाजं बनवणारी अनेक संघटना होती पण चोळांचं मात्र या कामात वैशिष्ट्य होतं.
चोळ जहाजं इतकी शक्तिशाली का होती?
चोळ घराणं लोखंड आणि तांब्याबरोबरच सागवान आणि फणसाच्या लाकडापासून जहाजं बनवत.यामुळे ती जहाजं अतिशय वेगवान, मजबूत आणि लांबच्या प्रवासासाठी पूर्णपणे तयार असत. यांच्या जहाजांपैकी एक म्हणजे ‘थिरिसदाई शिप्स’ ही चोळ नौदलाची वेगळी होत्या. ही जहाजं बलाढ्य असून समुद्रात तरंगणाऱ्या किल्ल्यांसारखी दिसायची
या जहाजांना खास दीर्घकालीन मोहिमांसाठी पाठवलं जात असे, यात सैन्य, घोडे आणि गरजेचा साठा असं सगळं सामावलं जायचं. याचं बरोबर लांबतच्या पल्याच्या प्रवासात किंवा युद्धजन्य परिस्थितीत वेगवान आणि अचानक हल्ल्यासाठी चोळ ‘वज्र शिप्स’ वापरत. या जहाजांची खासियत अशी की, या जहाजांच्या पुढील बाजूस असलेली टोकदार रचना शत्रूची जहाजं फाडून टाकत असे आणि विजय निश्चित करत असे ! खरतर प्रत्येक चोळ जहाज युद्धासाठी बांधले गेले असं नाही. चोळ घराण्याला युद्धकला पारंगत असण्याबरोबरच ते व्यापारात देखील कुशल होते. मसाले, कापड आणि सोन्याच्या व्यापार करत. लांबच्या प्रवासाला जाताना माल वाहून नेण्यासाठी ‘मरक्कलम शिप्स’ वापरली जात.
चोळ इतके लांबचे समुद्री प्रवास कसे करायचे ?
समुद्रकिनारी चोळांचं अख्खं आयुष्य गेलं. त्यांचा सागरी हवामान ताऱ्यांचा व मान्सून वाऱ्यांचा अभ्यास दांडगा होता. या ज्ञानामुळेच ते चीनपासून ते अरब देशांपर्यंतचे मार्ग तयार करू शकले.यापैकी काहीही त्यांच्या गजबजलेल्या बंदर शहरांशिवाय शक्य झाले नसते- नागापट्टिनम, कावेरीपट्टीनम आणि अरिकामेडू सारखी शहरे जागतिक व्यापार केंद्रे बनली होती.
1025 मध्ये राजा राजेंद्र चोळ याच्या सागरी मोहिमेने संपूर्ण जगाला चकित केलं! या राजाचं सैन्य 5000 किमी दूर इंडोनेशिया व मलेशिया (तेव्हा श्रीविजय साम्राज्य) पर्यंत पोहोचलं. एवढंच नाही तर या साम्राज्याने व्यापारमार्गावर नियंत्रण देखील मिळवलं आणि हिंदी महासागरात वर्चस्व गाजवलं.आपल्या सागरी सामर्थ्याच्या जोरावर चोळांनी जगभर व्यापार वाढवला. कपडे, मसाले आणि सोने निर्यात करुन दक्षिण भारताला नौदलआणि व्यापारी उद्योगात मोठ्या स्तरावर नेलं.अशा प्रकारे चोळांनी फक्त सागरी सत्ताच नव्हे तर व्यापारावर देखील सत्ता निर्माण केली होती.






