
हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! 'या' साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य त्वचा आणि केसांचे सुद्धा आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या दिवसांमध्ये शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, केस कोरडे होणे, चेहऱ्यावर पिंपल्स, ऍक्ने येणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. थंड वातावरणामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा पूर्णपणे नष्ट होऊन जातो. त्वचेमधील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर त्वचा खरखरीत आणि रखरखीत होऊन जाते. अशावेळी महिला वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर आणि महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे कालांतराने त्वचा ताणल्यासारखी वाटते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतील. आज आम्ही तुम्हाला त्वचा कायमच टवटवीत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. अशावेळी नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनासोबतच ताक, दही, विटामिन सी युक्त पेयांचे सेवन केल्यास त्वचा कायमच हायड्रेट आणि ओलसर राहते. फॅट्स, जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स आणि पाणी इत्यादी घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, विटामिन ए, सी आणि ई, बदाम, अक्रोड, तीळ, जवस, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि आवळा इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
आपल्यातील अनेकांना कायमच चेहरा स्वच्छ करताना साबण लावण्याची सवय असते. पण केमिकल युक्त साबण त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब करून टाकतो. यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर त्या कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण लहान मोठ्या चुका त्वचेची पीएच पातळी खराब करून टाकतात.अंघोळ केल्यानंतर त्वचा हलकीशी ओली ठेवावी. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर, बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल लावल्यास त्वचेवरील कोरडेपणा कमी होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये खूप कमी तहान लागते. पाणी पिण्याची जास्त इच्छा होत नाही. अशावेळी पुरेसे पाणी, कोमट पाणी, सूप, हर्बल चहा घेतल्यास त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया त्वचा आतून खराब होण्याचे महत्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाणी, आवळ्याचा रस, डिटॉक्स ड्रिंक प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.