
शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३०० कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या ६ पदरी उड्डाण पुलाच्या (ओव्हरब्रीज) गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात पुलाच्या पिलरमधून पाण्याच्या धारा वाहत आहेत. तब्बल ३०० कोटींच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उड्डाण पुलाचे लोकार्पण २९ मार्च २०२२ रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते. या ओव्हरब्रीजच्या निर्मितीमुळे साकोली शहराच्या मुख्य मार्गावरील जडवाहनांच्या ताणतणावात मोठी घट होऊन स्थानिकांना वाहतूककोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळाला होता. परंतु, केवळ तीन-चार वर्षांच्या अल्प कालावधीतच या कोट्यवधींच्या पुलाची झालेली दैना अत्यंत चिंताजनक ठरत आहे.
मुसळधार पावसामुळे या पुलाच्या पिलरमधील भेगामधून पाण्याचा विसर्ग अतिशय वेगाने होत आहे. पुलाच्या पिलर क्रमांक ४५, ४६ आणि ६६ मधील जॉइंट सुटले असून त्यामधून पावसाचे पाणी नळाच्या धारेप्रमाणे खाली जमिनीवर वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
३०० कोटींच्या निधीतून उभा राहिलेला हा उड्डाण पूल विकासाचे प्रतीक मानला गेला होता. परंतु अवघ्या तीन वर्षांतच त्याच्या पिलरमधून नळासारखे पाणी वाहू लागणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशांची सर्रास उधळण करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे हे स्पष्ट प्रमाण आहे. आज पुलाचे जॉइंट सुटत आहेत आणि डांबरी थर उखडत आहेत, उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? – कैलास गेडाम, जिल्हा महासचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम
७५ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीला दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच उड्डाण पुलाची पाहणी करून तातडीने मेंटेनेंस व दुरुस्ती करणे कायद्याने अनिवार्य असते. मागील तीन वर्षांपासून सातत्याने पावसाळ्यात या पुलावरून पाण्याची गळती होत आहे. नगर परिषदेमार्फत आता थेट थेट राष्ट्रीय महामार्ग हामार्ग प्राधिकरणाला गाला अधिकृत पत्र पाठवून या पुलाची तातडीने व दीर्घकालीन दुरुस्ती करून घेण्याबाबत कडक सूचना दिल्या जातील.
पाण्याच्या सततच्या धारेमुळे केवळ पिलरच नव्हे, तर पुलाच्या अगदी वरच्या पृष्ठभागावरील (सरफेस) डांबरी थर अनेक ठिकाणी उखडला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या आतच हा राष्ट्रीय स्तरावरील पूल मेंटेनन्स आणि दुरुस्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यामुळे या प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीच्या निकृष्ट कार्यप्रणालीवर आणि यंत्रणेच्या देखरेखीवर तीव्र शंका उपस्थित होत आहे. या खस्ताहाल आणि धोक्याच्या परिस्थितीमुळे शहरातील नागरिक व वाहनचालक स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे धास्तावले आहेत.