dry Drought Ubt Shiv sena protest Buldhana
MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत आणि कोणतीही अट न ठेवता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच प्रलंबित कर्जमाफीच्या दुसऱ्या याद्या जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांना फीमाफी द्यावी, पशुधनासाठी चारा छावण्यांचा अग्रक्रमाने विचार करावा, तसेच वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरा ठरत असलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेनाच्या वतीने तीव आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, लखन गाडेकर, सुनील घाटे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, विजय इंगळे, गणेश रिंढे, सुनील भाग्यवंत, विजय राऊत, डॉ. अरुण पोफळे, संजय शिंदे, रामशंकर सोनुने, रवींद्र पवार, संजय गवळी यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






