Farmer Demands Dry Drought Declaration
Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, कर्जाबाबत दिलासा देण्यात यावा तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान, ३० व ३१ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या व नाल्यांना मोठा पूर आला होता. पुरामुळे काही नद्यांनी प्रवाह बदलला, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्यापही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. आंदोलनात अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, भागवत वाघ, अजहर शेख, त्रिलोकसिंग राजपूत, राजेंद्र राखुंडे, अशोक राखुंडे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सय्यद भाऊ, नीलेश अवसार, सागर वाघ, सागर गवई, उल्हास झाटे, सचिन झाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण खंडारे, गौतम तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यात यावी, वाहून गेलेल्या जनावरांची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी तसेच भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी नद्या व नाल्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी






