Dry Drought Declaration
चालू खरीप हंगामात अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, मका यांसह विविध खरीप पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांवर मानसिक व आर्थिक ताण निर्माण होत आहे. पिकांची आणि शेतकऱ्यांची ही गंभीर अवस्था पाहता शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाड़ा अध्यक्ष गजानन कावरखे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, अॅड. प्रवीण सुरडकर, सुनील मिसाळ, बाळू पाटील, नितीन सोनटक्के, नीलेश राजपूत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी वियाणे, खते, औषधे, मशागत व इतर शेती खर्चासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके हातातून जाण्याचे आणखी मोठे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके नष्ट होऊन खरीप हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत.






