Buldhana Urban Painganga Sugar Factory
यावेळी बोलताना संचालक अनिल गुंजाळ यांनी भाईजींनी जिल्ह्याच्या विकासासाठी पाहिलेले औद्योगिक विकासाचे स्वप्न, शेतकरी हित तसेच तरुण वर्गासाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून अविरत प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला. आगामी गाळप हंगामासाठी यंत्रसामग्री, मिल, बॉयलर व उत्पादन विभागाची तयारी तसेच शेतकी विभागामार्फत ऊस तोडणी-वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्णत्वास आले असून सुरळीत व कार्यक्षम गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते जयवंत आवटे यांनी ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावरील व्याख्यानातून त्यांनी कामावर प्रेम करावे आणि संस्थेप्रती निष्ठा ठेवावी, असा संदेश दिला.
पेनगंगा साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामात ३ लाख ११ हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले, त्यासाठी ऊस उपलब्धता, तोडणी वाहतूक व्यवस्था आणि कारखान्याची तांत्रिक क्षमतेचे नियोजन करण्यात आहे.






