जळगाव : नशिराबाद येथील शेतात काढणीला आलेल्या पुर्ण वाढ झालेल्या उसाच्या शेतात वरुन गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉटसर्कीटने स्पार्कींग होऊन आग लागली. २ हेक्टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आले आहे.
नशिराबाद येथील दीपक अशोक नारखेडे (वय ३३ रा. खालची अळी) यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर (१५२/१ मध्ये २ हेक्टर ११ आर) शेत आहे. या शेतात त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. शेतात डोक्यावर जाईल असे पिक बहरले. एक देान दिवसात साखर कारखान्यातून संकेत मिळताच कापणीला सुरवात होणार होती. मात्र, मंगळवार (१२ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत ताऱ्यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला लागली.
[read_also content=”ईडी चौकशीनंतर पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… https://www.navarashtra.com/india/the-first-reaction-of-the-former-chief-minister-of-punjab-after-the-ed-inquiry-said-nrdm-269023.html”]
दरम्यान आगीत ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकरी दीपक नारखेडे यांचे ६ लाख ३० हजार रूपयांचा ऊस आणि २० हजार रुपये किमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात दीपक नारखेडे यांनी नशिराबाद येथे दिलेल्या खबरी वरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र ठाकरे करीत आहे.