
‘सीएसएमटी-मडगाव’ रेल्वे उन्हाळी सुट्टीत धावणार
मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय
24 मार्चपासून सुरू झाले रेल्वेचे आरक्षण
खेड: उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी-मडगाव स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे आरक्षण २४ मार्चपासून सुरू होणार आहे. ०११२९/०११३० क्रमांकाची ही स्पेशल गाडी ३ व ५ एप्रिल रोजी धावणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मडगावहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी येथे आगमन होईल. २२ डब्यांची ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांत ८ मेल-एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. रविवारपासून याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या कोकणवासिय प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. तर कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनाकोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर सिंधुदुर्ग या जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर मरुसागर अजमेर एक्प्रेस गाडीला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर रेल्वे बोर्डाने मंजूर केल्याप्रमाणे मरूसागर एक्सप्रेस या नव्या गाडीचा पहिल्यांदाच थांबा मिळाल्याने भव्यस्वागत करण्यात आले.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना दशकोशीतील सरपंच रेल्वे प्रवासी नागरिक यांच्या वतीने मोटरमन आप्पा कदम, पि. के. सावंत स्टेशन मास्तर गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन या रेल्वेगाडीला हार व श्रीफळ वाढवून भव्यस्वागत करण्यात आले.
जनआंदोलनातून वेधले होते लक्ष
कोकणातील प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी सिंधुदुर्ग नगरी हे जिल्हा मुख्यालयाचे मुख्य स्टेशन आणि या स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा द्या, या मागणीबाबत सातत्याने मागण्या, जनआंदोलन उभारून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.