
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब
विदर्भात आतापर्यंत सर्वाधिक ८४३.९ मिमी पाऊस गोंदिया जिल्ह्यात झाला आहे. त्यापाठोपाठ गडचिरोलीत ८०४ मिमी, भंडारा ६०९.७ मिमी, यवतमाळ ५४२.३ मिमी आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूरनंतर वर्धा जिल्ह्यात ४४६.४ मिमी, वाशिम ४३२.४ मिमी, बुलढाणा ४३०.८ मिमी, नागपूर ४१९.१ मिमी, अमरावती ३९६.६ मिमी आणि अकोला जिल्ह्यात ३६६.४ मिमी पाऊस झाला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जिल्ह्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची तूट जाणवत आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान यांसह इतर पिकांच्या वाढीसाठी नियमित पावसाची आवश्यकता आहे. पावसात पडणाऱ्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे. नद्या, नाले व जलसाठ्यांना दिलासा : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे काही नदी-नाले तसेच तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, आगामी काळात सातत्यपूर्ण पाऊस झाल्यास सिंचन प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासोबतच भूजलपातळीलाही अपेक्षित फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेतीसाठी पुढील पावसाचे महत्त्व वाढले आहे.
Nagpur News : १४ लाखांवर मतदार गळणार? एसआयआरसाठीची मुदत संपली,अर्ज अप्राप्त
पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात यंदा पावसाचा जोर अधिक राहिला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पर्जन्यमान विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे वितरण असमान असल्याने खरीप पिकांसाठी पुढील काही दिवसात होणारा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.