
Chandrapur News: चंद्रपुरात वाघांची संख्या ३०० पार; वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
त्यामुळे वाढत्या वाघांच्या संख्येबरोबर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, मूल, सावली आणि इतर वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक वाघांनी संरक्षित जंगलांच्या सीमाही ओलांडल्या असून ते शेती, गावांच्या परिसरात तसेच मानवी वस्तीजवळ वारंवार दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गुराखी आणि जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
मागील ५ वर्षात वाघांच्या हल्ल्यात २२० नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव जनावरांवर होणारे हल्लेही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाकडून नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपद्वारे निरीक्षण, जनजागृती, तातडीच्या बचाव पथकांची नियुक्ती आणि संघर्षग्रस्त भागांमध्ये विशेष उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची व्याप्ती आणखी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः गावांमध्ये तत्काळ सूचना प्रणाली, प्रशिक्षित रेस्क्यू पथके, कॉरिडॉरचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याची मागणी होत आहे.
चंद्रपूर व्याघ्र जिल्हा म्हणून ओळखले जातो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण वनक्षेत्रात वाधाची संख्या अधिक आहे. आज जिल्ह्यातील वाघाची संख्या ३०० च्या घरात पोहचली आहे. मात्र व्यवस्थापन दर्जा मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत प्रादेशिक वनक्षेत्रात कमजोर आहे. सातत्याने मनुष्यबळ, संसाधने आणि निधीची पूर्तता केली जात नसल्याने व्याघ्र संवर्धन आणी वाघ-मानव संघर्ष हाताळणे कठीण होत आहे. कोर-बफर पेक्षा प्रादेशिक वनक्षेत्रात असलेल्या गावात वाघ मानव संघर्ष तीव्र असल्याने त्याच्या व्यवस्थापनात एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील संघर्ष निवारण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलणे आणी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. – बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर
‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
वाघांच्या वाढत्या संख्येसोबतच मागील काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील जंगलात, शेतशिवार परीसरात, रेल्वे ट्रॅकवर वाघांचे मृत्यू होत असल्याच्या घटना वाढल्यामुळे ही चिंतनाची बाब बनलेली आहे. सोबतच वाघांवर तात्पूरते उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरवरही क्षमतेपेक्षा तिनपट प्राण्यांवर उपचार होत असल्याची बाब समोर आल्यामुळे वाघांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.