
नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! 'या' तारखेपासून थेट घरात येणार नळ
वाढीव पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नव्या योजनेचा लाभ सर्वप्रथम नो-नेटवर्क भागांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरासाठी अतिरिक्त पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या तीन ते चार दिवसांत सुमारे २० एमएलडी वाढीव पाणी शहराला मिळाले आहे. सध्या हे पाणी महापालिकेच्या विद्यमान वितरण यंत्रणेद्वारे विविध भागांत पोहोचविले जात आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार १२ जूनपासून नवीन योजनेतील १५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार असून हसूल जटवाडा परिसरापर्यंत नव्या योजनेचे पाणी पोहोचविण्याची तयारी सुरू आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, नवीन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी १० जलकुंभ नो-नेटवर्क भागात आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पाणीवितरणाची अंमलबजावणी प्रथम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जलवाहिन्या टाकण्याचे काम पुढील काही दिवसांत सुरू होईल. नळजोडण्या देण्याबाबत महापालिकेकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांना या सूचनांनुसारच काम करणे बंधनकारक राहणार आहे.
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील १५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी १२ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून हर्सल जटवाडा भागापर्यंत नवीन योजनेचे पाणी पोहोचविले जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मिळालेल्या २० एमएलडी वाढीव पाण्याचा पुरवठा सध्या जुन्या वितरण यंत्रणेतून केला जात असून, नवीन व्यवस्था सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठ्याची क्षमता आणखी वाढणार आहे.
नवीन योजनेतील १९ पैकी १० जलकुंभ नो-नेटवर्क भागात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांना प्राधान्याने नळजोडण्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलवाहिन्या टाकणे, नळकनेक्शन देणे आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करणे या सर्व कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे तयार केली जाणार असून त्यानुसारच अंमलबजावणी होणार आहे.