
रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारचा १४ तलाव संरक्षण प्रकल्पांचा निर्णय रद्द केल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या ११ प्रकल्पांचा समावेश होता. हा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि अहवाल सादर न केल्यामुळे घेतला गेला, आणि वितरित केलेले ७३ कोटी परत मागण्यात आले आहेत. यावरून फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा निर्णय फिरवला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता सामंत म्हणाले, आम्हाला सरकारमध्ये नव्याने येऊन एक वर्ष सात महिने झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बॉण्डिंग अत्यंत चांगले आहे. तरीही काही तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय झाला असावा. मात्र कुणी कुणावर कुरघोडी करतेय असा कुठलाही मुद्दा नसल्याचे सांगून त्यांनी हा मुद्दा खोदून काढला.
पाईपच नाही, पण गॅस देण्याच्या घोषणा! पीएनजी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; ग्रामीण भागात शून्य प्रगती
मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत म्हणाले, विरोधकांना जी काही टीका करायची ती करू द्या, मात्र त्यांच्या कालावधीत काय झाले हे देखील मला माहिती आहे. मात्र त्याचे मला राजकीय भांडवल करायचे नाही. आत्महत्यांचे प्रमाण थांबले पाहिजे किंवा त्या होऊच नये हीच सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही ते म्हणाले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मंत्री सामंत यांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. यावर मंत्र सामंत म्हणाले, कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून विकासाला दिशा देणारे ते नेतृत्व आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांना भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी त्यांना भेटलेलो नाही आणि भेटणारही नाही.
Maharashtra Politics: विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…