Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडी नाही, तर ‘बॉन्डिंग’ मजबूत”; निर्णयावरून रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही मतभेद नसून कुरघोडीच्या चर्चा चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 02:10 PM
रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)

रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडी नाही
  • तर ‘बॉन्डिंग’ मजबूत”
  • निर्णयावरून रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते, आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. दोघांमध्ये अतिशय चांगली बॉन्डिंग असून कोणी कोणावर कुरघोडी करतेय याचे मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी खंडन केले. शहरात कौशल्य विकास केंद्राचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत शहरात आले होते. तत्पूर्वी विमानतळावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारचा १४ तलाव संरक्षण प्रकल्पांचा निर्णय रद्द केल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या ११ प्रकल्पांचा समावेश होता. हा निर्णय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि अहवाल सादर न केल्यामुळे घेतला गेला, आणि वितरित केलेले ७३ कोटी परत मागण्यात आले आहेत. यावरून फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा निर्णय फिरवला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता सामंत म्हणाले, आम्हाला सरकारमध्ये नव्याने येऊन एक वर्ष सात महिने झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बॉण्डिंग अत्यंत चांगले आहे. तरीही काही तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय झाला असावा. मात्र कुणी कुणावर कुरघोडी करतेय असा कुठलाही मुद्दा नसल्याचे सांगून त्यांनी हा मुद्दा खोदून काढला.

पाईपच नाही, पण गॅस देण्याच्या घोषणा! पीएनजी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; ग्रामीण भागात शून्य प्रगती

मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत म्हणाले, विरोधकांना जी काही टीका करायची ती करू द्या, मात्र त्यांच्या कालावधीत काय झाले हे देखील मला माहिती आहे. मात्र त्याचे मला राजकीय भांडवल करायचे नाही. आत्महत्यांचे प्रमाण थांबले पाहिजे किंवा त्या होऊच नये हीच सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही ते म्हणाले.

प्रहारचे बच्चू कडू यांच्याशी भेट नाही

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मंत्री सामंत यांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. यावर मंत्र सामंत म्हणाले, कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून विकासाला दिशा देणारे ते नेतृत्व आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांना भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी त्यांना भेटलेलो नाही आणि भेटणारही नाही.

Maharashtra Politics: विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…

Web Title: Uday samant clarifies bonding between fadnavis and shinde over project decisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार; ‘डिहायड्रेशन’ आणि डोकेदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ
1

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार; ‘डिहायड्रेशन’ आणि डोकेदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ
3

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ

शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’
4

शहानूरवाडी आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे ‘जनआंदोलन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.