Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौलत साखर कारखाना सुरू; कामगारांच्या मागण्या मान्य

दीव्यवस्थापन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज झालेल्या बैठकीत संपुष्टात आला. शेवटच्या सहाव्या बैठकीत माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर आपण वचनबद्ध राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वानुमते कामगारांनी संमती दर्शवली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2022 | 04:20 PM
दौलत साखर कारखाना सुरू; कामगारांच्या मागण्या मान्य
Follow Us
Close
Follow Us:

चंदगड : दीव्यवस्थापन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज झालेल्या बैठकीत संपुष्टात आला. शेवटच्या सहाव्या बैठकीत माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर आपण वचनबद्ध राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वानुमते कामगारांनी संमती दर्शवली.

कारखाना गळीत हंगाम सुरू करण्यासाठी शनिवार (दि. १२) पासून शिफ्टनुसार कामावर हजर होण्याचे कामगारांनी मान्य केले. दिवाळी सणाच्या बोनसवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान कामगारांच्या उद्रेकाने हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच ‘अथर्व’ चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी आपल्याला व कामगारांना भविष्यात धोका असल्याने दगडफेक व हाणामारी करणाऱ्या कामगारांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. कामगारांनीही अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे अध्यक्ष व त्यांच्या पुत्रावर दाखल केल्याने दोघांचाही ‘इगो’ दुखावला आणि वाद विकोपाला गेला. गळीत हंगामाच्या पहिल्याच दिवशी दगडफेक आणि हाणामारी झाल्याने हंगाम लांबला. पाच मोठ्या सभा झाल्या.

एक पाऊल मागे घेण्यास कुणीही तयार नव्हते. ५९ कामगारांना वगळून कारखाना सुरू करणार या खोराटे यांच्या भूमिकेला कामगारांनी तीव्र विरोध केला. आपल्या भूमिकेशी कामगारही ठाम राहिले. अखेर हा वाद  हसन मुश्रीफ यांच्याकडे गेला. ५९ कामगारांना कामावर घेणार, पण त्यातील २० कामगारांना घरी बसवून पगार देणार असल्याचे खोराटे यांनी सांगताच गुरुवार (दि. १०) रोजी कोल्हापूर येथेही झालेली चर्चा निष्फळ ठरली. कारखाना बंद राहिला तर ऊस शेतात राहण्याची भीती उपस्थित होती.

७ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार : खोराटे

गळीत हंगामाला काहीसा उशीर झाला असला तरी ७ लाख टनाचे गाळप करण्यासाठी कामगारांनी प्रयत्नशील राहावे. राग, द्वेष सारे विसरून पुन्हा जोमाने कामाला लागूया, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष खोराटे यांनी केले.  शेतकऱ्यांचा वाढता दबाव अलीकडे कामगारांच्यावर आला होता. त्यामुळेच हा वाद २० कामगारांच्यापर्यंत येऊन पोहोचला होता. शेवटी सहाव्या सभेत कामगारांना कामावर घेण्याचे ठरले. यावेळी भरमुआण्णा पाटील, नितीन पाटील, सुभाष जाधव, आबासो चौगुले, प्रदीप पवार यांची भाषणे झाली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, शांताराम पाटील, अनिल शिवणगेकर, रवी बांदिवडेकर यांच्यासह कामगार उपस्थित होते.

के.डी.सी बँक आमचीच, हसन मुश्रीफ आमचेच

के.डी.सी. बँक आमचीच…आणि हसन मुश्रीफ आमचेच आहेत, त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊया. मुश्रीफचं हा प्रश्न सोडवतील असे अनेकांनी सभेत बोलताना सांगितले. कोल्हापूरला झालेल्या चर्चेत अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांना हा वाद मिटविण्यासाठी अपयश आले.

माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत अखेर यश आले. आणि दौलत साखर कारखान्याची चाके फिरली. अथर्व कंपनीच्या व्यवस्थापनाने, दौलत च्या कामगारांनी सांमज्यस्यांची भुमीका घेऊन कारखाना सुरळीत चालवून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काम करावे, असे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी सांगितले.

Web Title: Daulat sugar factory started accept the demands of the workers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 04:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Raju Shetti
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…
1

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले
2

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल
3

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक
4

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.