धाराशिवची पाणीस्थिती चिंताजनक; २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
धाराशिव जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण १२.२२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये लोअर तेरणा प्रकल्पात ३८.०६ टक्के तर मांजरा प्रकल्पात २०.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या प्रकल्पांतील साठा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण १२.६९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांच्या एकत्रित क्षमतेच्या तुलनेत हा साठा सुमारे २१ टक्के इतका आहे.
जिल्ह्यातील २०८ लघु प्रकल्पांमध्ये एकूण २८.४२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून अनेक तलाव आणि बंधारे अत्यल्प क्षमतेवर आहेत. काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र कमी असल्याने पाणीसाठा होत नसल्याचे, तर काही प्रकल्प बांधकामाधीन अथवा दुरुस्तीच्या अवस्थेत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाच्या तालुकानिहाय वर्गवारीनुसार –
१०० टक्के भरलेले प्रकल्प : ०
७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा : ०
५१ ते ७५ टक्के साठा : ४
२५ ते ५० टक्के साठा : १६
२५ टक्क्यांपेक्षा कमी साठा : ९०
जोताखालील (अत्यल्प) साठा : १०६
पूर्णपणे कोरडे प्रकल्प : ११
अशा प्रकारे २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे चित्र समोर आले आहे.
लघु व साठवण तलावांच्या बाबतीत सर्वाधिक प्रकल्प तुळजापूर तालुक्यात (६७) असून त्यापैकी ३७ प्रकल्प जोताखालील स्थितीत आहेत. उमरगा तालुक्यातील ३२ पैकी २१, धाराशिव तालुक्यातील ४२ पैकी १२, तर भूम तालुक्यातील २० पैकी १३ प्रकल्प जोताखालील श्रेणीत आहेत.
मान्सूनने अद्याप अपेक्षित वेग पकडलेला नसल्याने जिल्ह्यातील बहुतेक जलसाठ्यांवर पाण्याचा ताण कायम आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता आगामी काही आठवड्यांतील पावसावर जिल्ह्याची जलस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाटबंधारे विभागाच्या १७ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ५३.३४१ टीएमसी असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे २२ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ३७ टक्क्यांच्या आसपास होता. त्यामुळे यंदा पाणीस्थिती अधिक तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा असलेले केवळ चारच प्रकल्प आहेत.
चांदणी मध्यम प्रकल्प (परंडा) – सुमारे ७३.५० टक्के
जनापूर मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७०.६८ टक्के
कोरेगाव मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७४.३३ टक्के
दाळिंब मध्यम प्रकल्प (उमरगा) – सुमारे ७२.३० टक्के
या चार प्रकल्पांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित सर्व प्रकल्पांची स्थिती त्यापेक्षा कमी आहे.
जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या लोअर तेरणा प्रकल्पात सुमारे ३८.०६ टक्के, तर मांजरा प्रकल्पात सुमारे २०.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दोन्ही मोठे प्रकल्प ५० टक्क्यांच्या खाली असल्याने सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अनेक प्रकल्प अत्यल्प साठ्यावर
वर्गवारीनुसार जिल्ह्यातील –
४ प्रकल्प : ५० टक्क्यांपेक्षा जास्त
१६ प्रकल्प : २५ ते ५० टक्के
९० प्रकल्प : २५ टक्क्यांपेक्षा कमी
१०६ प्रकल्प : जोत्याखालील (अत्यल्प साठा)
११ प्रकल्प : पूर्णपणे कोरडे
अशी स्थिती आहे. त्यामुळे बहुतांश तलाव, बंधारे आणि लघु प्रकल्प मान्सूनवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार तुळजापूर, उमरगा, धाराशिव, भूम आणि कळंब तालुक्यातील मोठ्या संख्येने लघु प्रकल्प जोत्याखालील किंवा २५ टक्क्यांपेक्षा कमी साठ्याच्या श्रेणीत आहेत. काही प्रकल्पांमध्ये पाणलोट क्षेत्र कमी असल्याने पाणी साचत नसल्याचे, तर काही ठिकाणी दुरुस्ती किंवा बांधकाम सुरू असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील २२७ पैकी २२२ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने आगामी काही आठवड्यांतील पावसावरच पिण्याचे पाणी, सिंचन आणि पशुधनाच्या पाण्याच्या गरजांचे नियोजन अवलंबून राहणार आहे. जलसाठ्यांची सद्यस्थिती पाहता प्रशासनासह शेतकऱ्यांचेही लक्ष आता मान्सूनच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.






