आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी उमरगा येथे भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.
२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धाराशिव येथील माविमला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून, बचतगटांच्या बळावर महिलांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.
जयभीम’च्या घोषणांनी आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने कार्यक्रमाची रात्र रंगली. Adarsh Shinde यांच्या भीमा गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले आणि क्रांतीचा संदेश दिला.
Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अवघ्या २४ तासांत घेतला. नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.
धाराशिव येथे दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतापाची लाट उसळली आहे. Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनातील अडथळे दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून तपासाची मागणी करण्यात येत आहे.