धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या पुढाकारातून हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदाधारित संरचित संशोधन प्रकल्पाचा समारोप झाला. वर्षभर 130 रुग्णांवर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या समन्वयातून उपचार करण्यात आले.
ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमराजेंनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी धा...
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिस आणि सीआयडीवर दबाव होता, असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा केवळ २२ टक्के इतका नोंदविण...
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात खताच्या नावाखाली लालसर मातीची विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.
मुलीच्या वाढदिवसानिमित्त बेंबळीतील एका बेकरीमधून केक खरेदी करण्यात आला होता. संबंधित महिलेनेही या केकचे सेवन केले. मात्र काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत बिघाड होण्यास सुरुवात झाली.
लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला, तरी धाराशिव जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि प्रारंभीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून ८ जूनपर्यंत अपेक्षित ३३.८ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट म्हणजेच १९६.४ टक्के पर्जन्यमान झाले आहे.
अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा विषय सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक्रियेला विरोध दर्शवत भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तुळजापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने देशपांडे स्टॅण्ड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी साहित्य हे समाजाला दिशा देणारे आणि परिवर्तन घडविणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. नवोदित साहित्यिकांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द...