PMAY Dharashiv News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया गतिमान केली आहे. सन २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या याद्या आता उपलब्ध झाल्या असून, या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १ लाख ८ हजार २३२ कुटुंबांची नोंद करण्या...
'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली...
पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी तो तत्काळ तयार करून घ्यावा.
विमा कंपनीने सादर केलेली तांत्रिक उत्पादन आकडेवारी वस्तुस्थितीशी विसंगत असून, त्यामुळे हजारो शेतकरी न्याय्य भरपाईपासून वंचित राहत आहेत. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 45 हजार इतकी भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १.५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून विविध मूलभूत सुविधा उभारण्याच्या कामांना लवकरच गती मिळणार...
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरपीआय (खरात), रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक भागांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडल्याने तणाव निर्माण झ...
कर्जमाफी योजनेपासून अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने ग्राहक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संबंधित सहकारी सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याला तातडीने बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले, मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चापोटी 20 हजार रुपयांची भरपाई द...
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींना सोळाव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार नसल्याचा इशारा दिला.
धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि ३ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर नियुक्ती करण्यात आली.
दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे धाराशिव राज्यातील महत्त्वाचे हरित...
धाराशिव जवळील येडशी फॉरेस्ट परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून संतोष देशमुख या ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Ashadhi Wari : धाराशिव नगरपरिषदेच्यावतीनेही पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी पालखीसमोर नम्र अभिवादन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या
धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 सोयाबीन पीकविमा प्रकरणात केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (TAC) विमा कंपनीचे अपील फेटाळून राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा (STAC) निर्णय कायम ठेवला आहे. पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांत पीकविमा भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले असून, 14 वगळलेल्या मंडळांतील शेतकऱ्यांनाही ...