२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अवघ्या २४ तासांत घेतला. नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.
धाराशिव येथे दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे संतापाची लाट उसळली आहे. Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनातील अडथळे दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून तपासाची मागणी करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात ‘हर घर संविधान’ उपक्रमावर घोटाळ्याची सावली पडली असून उद्देशिका फ्रेम वितरणात अनियमिततेचे आरोप होत आहेत. या प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धाराशिव शाखेच्या वतीने शुक्रवारी ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. असीम सरोदे यांनी काही परखड विचार मांडले.
रक्त तपासणी अहवाल वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या निदान व उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले. वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुमारे १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा फरक काढून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
बेंबळी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, कमी क्षमतेच्या पंपांमुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे