Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

धाराशिव जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण २२५ प्रकल्प तपासले असता, त्यांच्या उपयुक्त पाणीसाठ्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६.३६ टक्के साठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 04:53 PM
धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

Follow Us
Follow Us:

धाराशिव/शीतलकुमार शिंदे : धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने जलसाठ्याची स्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण २२५ प्रकल्प तपासले असता, त्यांच्या उपयुक्त पाणीसाठ्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६.३६ टक्के साठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, २२५ पैकी तब्बल २२० प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. केवळ ५ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त साठा असल्याचे अहवालातील वर्गवारीत नमूद आहे.

जिल्ह्यातील सिना-कोळेगाव हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. त्यात सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के असल्याचे तक्त्यात दिसून येते. मध्यम प्रकल्पांची संख्या १७, तर लघु प्रकल्पांची संख्या २०७ आहे. या सर्व प्रकल्पांचा एकत्रित विचार करता परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

बाणगंगा सर्वाधिक, पण साठा तरीही केवळ ३३.२३ टक्के

मध्यम प्रकल्पांमध्ये बाणगंगा प्रकल्पात ३३.२३ टक्के, तेरणा प्रकल्पात २२.२६ टक्के, रायगव्हाणमध्ये १४ टक्के, तर खासापूरमध्ये ९.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दुसरीकडे रुई प्रकल्पात ४.९९ टक्के, रामगंगा २.२० टक्के, तर संगमेश्वर आणि चांदणी प्रकल्पात उपयुक्त साठा शून्य टक्के आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या कुरनूर प्रकल्पात ९.०५ टक्के, खंडाळा प्रकल्पात ६.७९ टक्के, जकापूरमध्ये ३.२२ टक्के, तर तुरोरी प्रकल्पात ३.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविला आहे. हरणी, चांदणी, खंडेश्वर, साकत आदी काही प्रकल्पांमध्येही साठा अत्यल्प किंवा शून्य असल्याचे तक्त्यातून दिसते.

लघु प्रकल्पांची स्थितीही गंभीर

जिल्ह्यातील २०७ लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा अत्यल्प आहे. अनेक प्रकल्पांमध्ये साठा शून्य टक्के नोंदविला आहे, तर काही ठिकाणी तो १० ते ३० टक्क्यांच्या आसपास आहे. लोहारा तालुक्यातील माळेगाव साठवण तलाव, हिरापूर ल.पा. आणि हिरापूर (रवा) साठवण तलाव यांच्यासह इतर प्रकल्पांचीही नोंद अहवालात आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घसरण

अहवालातील एकत्रित आकडेवारीनुसार, चालू वर्षातील प्रत्यक्ष उपयुक्त पाणीसाठा ६.३६ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही स्थिती मोठी घसरण दर्शविते. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती यंदा अत्यंत प्रतिकूल असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

पावसानेही पाठ फिरवली

पाटबंधारे विभागाच्या अहवालात ७ जून २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील तालुकानिहाय पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे ३२०.३८ मिमी असून ते अपेक्षित हंगामी पर्जन्यमानाच्या केवळ ३९.२३ टक्के इतके आहे. जिल्ह्यासाठी अपेक्षित सरासरी हंगामी पर्जन्यमान ७७७.९ मिमी असल्याचे अहवालात नमूद आहे.

तालुकानिहाय पाहता कळंबमध्ये ३९६.३० मिमी, भूममध्ये ३९६.०० मिमी, वाशीमध्ये ३३२.४० मिमी, लोहारा २९६.४३ मिमी, धाराशिव २८१.९० मिमी, तुळजापूर २८४.६० मिमी, परंडा २७८.४० मिमी आणि उमरगा २५९.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट कायम आहे.

पाणीटंचाईचे सावट अधिक गडद

पावसाची तूट आणि प्रकल्पांमधील अत्यल्प उपयुक्त साठा यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः २२५ पैकी २२० प्रकल्प ५० टक्क्यांखाली असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अहवालात काही प्रकल्पांबाबत तांत्रिक अडचणींच्याही नोंदी आहेत. काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र कमी असल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा होत नाही, काही प्रकल्प बांधकामाधीन आहेत, तर काही ठिकाणी सांडवे फोडून बांधकाम सुरू असल्याचे नमूद आहे. एका प्रकल्पात स्वयंचलित गेटमुळे ९३ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर गेट आपोआप उघडत असल्याने धरण १०० टक्के भरत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूणच, पावसाची ३९.२३ टक्के तूट आणि प्रकल्पांतील केवळ ६.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा ही धाराशिव जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून, पाणी वापराचे नियोजन आणि आगामी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना आता वेग देणे आवश्यक ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : भरधाव कार कठड्यावर आदळली, दोघांचा मृत्यू, केज-अंबाजोगाई मार्गावरील धक्कादायक घटना

Web Title: The water storage situation in dharashiv district has become critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • maharashtra
  • Water storage

संबंधित बातम्या

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन
1

राज्यातील सर्व शाळात आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; मुलांसोबत दररोज 20 मिनिटे ‘हा’ उपक्रम राबविण्याचेही आवाहन

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य
2

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
3

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !
4

Jaggery Price Hike: साखरेबरोबर गुळाचेही भाव वाढले: सणासुदीत सामान्यांना आर्थिक फटका पिशोरचा गावरान गुळ खातोय ‘भाव’ !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.