
धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?
नाराज पदाधिकारी सक्रिय होणार का ?
गाव, तालुका व जिल्हा स्तरावर नव्या चेहऱ्यांना संधी देत, संघटनाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी समन्वय बैठका घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
युवकांना अधिक जबाबदाऱ्या देत युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष विस्तारावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
पोकळी भरुन काढण्याचे प्रमुखांसमोर आव्हान
भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून मोठे काढणे हे सावंत यांच्यासमोरील आव्हान आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
धनंजय सावंत यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळीच माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला होता. निवडणुकीआधीच त्यांचे पुतणे धनंजय सावंत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत धनंजय सावंत यांनी भाजपला पाठींबा दिला होता. त्यानंतर महायुती म्हणून भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र निव़डणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर आठच दिवसात जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या समर्थकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये LPG चा तुटवडा? नागरिकांची अडचण; इंडक्शन स्टोव्हला वाढतेय मागणी