
डोमा आश्रमशाळा पडली ओस! भीती, अफवांमुळे ६०० विद्यार्थ्यांचे गावाकडे पलायन; मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर
मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पसरलेल्या कथित ‘भुताटकी’च्या अफवेने एकच खळबळ उडाली असून, भीतीच्या वातावरणामुळे तब्बल सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळा सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
२२ जुलै रोजी आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनी अचानक रडणे, हसणे आणि असामान्य वर्तन करू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळा प्रशासनाने तातडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी कोणताही शारीरिक आजार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पालकांनी मुलींना घरी नेले आणि त्यानंतर इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, निवासी आश्रमशाळा अक्षरशः ओस पडली. घटनेनंतर विविध अफवांनी जोर धरला. शाळेच्या ‘आत्मे’ संतप्त झाल्याची चर्चा रंगली. तर शाळेतील सांडपाणी जवळील मंदिरात गेल्याने देवता रुष्ट झाल्याचेही सांगितले जाऊ लागले. याशिवाय, परिसरातील एका मृत आदिवासी तरुणाचा आत्मा विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या कथाही पसरल्या. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत या सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ असण्याची शक्यता अधिक आहे. काही विद्यार्थिनींच्या असामान्य वर्तनामुळे निर्माण झालेली भीती आणि अफवांचे जाळे यामुळे हा परिणाम घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी भुताटकीचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे स्पष्ट केले. हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ अर्थात सामूहिक मानसिक तणावाशी संबंधित असू शकतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळेत मुक्काम करून अफवांचे खंडन केले. समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थिनी पुन्हा शाळेत परतण्यास तयार झाल्या आहेत. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि प्रशासनाने संयुक्तपणे समुपदेशन मोहीम हाती घेतली आहे. अंनिसच्या कार्यकत्यांनी स्वतः आश्रमशाळेत मुक्काम करून कोणतीही भुताटकी नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना पुन्हा शाळेत पाठवावे, असे आवाहन केले आहे.
शाळेच्या परिसरातील मोहाचे झाड तोडल्यामुळे ‘आत्मे’ संतप्त झाल्याची चर्चा रंगली. तर शाळेतील सांडपाणी जवळील मंदिरात गेल्याने देवता रुष्ट झाल्याचेही सांगितले जाऊ लागले. याशिवाय, परिसरातील एका मृत आदिवासी तरुणाचा आत्मा विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या कथाही पसरल्या. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत या सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.