Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथेनॉल निर्मीतीमुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार; उसाला मिळणार चांगला दर

साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, यापुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2022 | 03:09 PM
इथेनॉल निर्मीतीमुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार; उसाला मिळणार चांगला दर
Follow Us
Follow Us:

रांजणी : साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, यापुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या ऊसाला साखर कारखान्यांना चांगला भाव देखील देता येणार आहे.

वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात साखर कारखानदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. काही ठराविक साखर कारखाने सोडले तर शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे ऊस उत्पादकांना त्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाला चांगला भाव मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा ही सातत्याने अपेक्षा राहिलेली आहे, त्या अनुषंगाने अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. मात्र यापुढील काळात साखरेपासून इथेनॉल निर्मितीला मान्यता मिळाल्याने साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांना देखील चांगला भाव देता येईल.

उसाच्या मळीबरोबरच उसाचा रस, पाक तसेच निकृष्ट धान्य यापासून इथेनॉल तयार करण्यास आधीपासूनचं मान्यता होती. परंतु आता त्यात साखरेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने त्याकरिता कानपूर येथील राष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केल्याचे समजते. समितीच्या अहवालातील शिफारशी वरून हा निर्णय घेण्यात आला आहे. इथेनॉलसाठी साखर वळविणाऱ्या प्रकल्पांना सर्व माहितीच्या नोंदी काटेकोरपणे दररोज ठेवण्याचे आदेश देखील केंद्र शासनाने दिलेले आहेत. त्यामध्ये साखरेची आवक, इथेनॉलची निर्मिती पुरवठा आणि साठा याचा समावेश असेल.

व्याजाचा भुर्दंड घटणार

साखरेचे साठे पडून राहिल्यास साखर कारखान्याचे पैसे अडकून पडतात. परंतु, इथेनॉल निर्मितीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे इथेनॉल प्रकल्प ३०० दिवसापर्यंत चालविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पडून असलेली साखर इथेनॉलकडे वळविल्यास साखर कारखान्यांना व्याजाचा बसणारा भुर्दंड कमी होईल. गोदाम व्यवस्थापन खर्च भेटेल त्याचबरोबर इथेनॉल विकून शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी हाती पैसा येईल तसेच इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो, असे मत साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Ethanol production will improve the economic condition of factories sugarcane will fetch good price nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Raju Shetti
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न
1

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!
2

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
3

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
4

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.